शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: September 11, 2016 19:13 IST

शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर कृषी क्षेत्राला उदयोग वसेवांशी जोडणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि मध्यस्थांची साखळी तुटेल.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. ११ : शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर कृषी क्षेत्राला  उदयोग वसेवांशी जोडणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि मध्यस्थांची साखळी तुटेल. हा बदल घडविण्यासाठी शासनाने इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची योजना सुरु केलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. हिंगणघाटलगतच्या वणी येथील गिमाटेक्स कंपनीच्या आवारात विदर्भातील पहिल्या ३५० कोटींच्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन व गिमाटेक्सच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वित्त व नियोजन तथा वनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, हिंगणघाटचे आ. समीर कुणावार, वर्धाचे आ. डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्सचे अध्यक्ष बसंत मोहता, व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, अनुराग मोहता, विनीत मोहता विराजमान होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, उद्योगांच्या क्षेत्रात महाराष्ट्र सर्वाधिक सुलभता असणारे राज्य आहे. असे लिकान यु या जागतिक स्तरावरील मानांकन ठरविणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. महाराष्ट्रात एका वर्षांत दीड लाख कोटींची गुंतवणूक झालेली असून ही देशातील सर्वाधिक गुंतवणूक आहे. राज्याच्या सकल उत्पनात शेतीचा वाटा ११ टक्के आहे. मात्र ४५ टक्के रोजगार निर्मिती होते. यामुळे कृषी क्षेत्राची अवस्था अशी आहे. कृषी क्षेत्र जोपर्यंत उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडणार नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रात बदल होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

फार्म टु फॅशन संकल्पना शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवेल  - सुधीर मुनगंटीवारशेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी शासन फार्म टु फॅशन ही संकल्पना राबवित आहे. त्याचा प्रत्यय इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातूनआज येत आहे. हिंगणघाटसारख्या छोट्या शहरात इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कमुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या कापडांची निर्मिंती होईल, असा विश्वास  वित्त व नियोजन तथा वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सरकार लोकांसोबत आहे. ह्यहम आपके है कोनह्ण म्हणत नाही. ह्यहम साथ साथ हैह्ण म्हणत सर्वांना सोबत घेऊन हे सरकार पुढची वाटचाल करीत आहे. विदर्भात उद्योग आल्यास आनंद होतो. पूर्वी मुंबईतून निघालेला पैसा थेट बारामतीत जायचा. आता तो निघाल्यानंतर सुपर एक्स्प्रेस वे मार्गे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पोहचणार आहे, अशी कोटीही त्यांनी केली.