शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अफजल, निजाम, नालायक आणि लायकी!

By admin | Updated: June 12, 2016 06:28 IST

लोकसभा निवडणुका एकत्र लढविल्यानंतर शिवसेनेला अचानक भाजपात अफलज खान दिसला. त्याचे जे काय पडसाद उमटायचे ते विधानसभेत उमटले आणि नंतर सत्तेच्या मोहापायी तीच

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

लोकसभा निवडणुका एकत्र लढविल्यानंतर शिवसेनेला अचानक भाजपात अफलज खान दिसला. त्याचे जे काय पडसाद उमटायचे ते विधानसभेत उमटले आणि नंतर सत्तेच्या मोहापायी तीच शिवसेना अफजल खानाच्या बगलेत शिरली. काही काळ सत्तारूपी संसाराचे गाडे चालले न चालले, तो पुन्हा त्याच शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांना दिल्लीतले सरकार निजामाच्या बापासारखे वाटू लागले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राज्य सरकार नालायक वाटायला लागले. मात्र राज्यातील सरकारसोबत बसण्याची उद्धवची लायकी नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आता सेना-भाजपात लावून दिली आहे.कोणत्याही स्थितीत सेना-भाजपात जोरदार झोंबाझोंबी राष्ट्रवादीला हवी आहे. राज्यातले सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीने दोघांमध्ये भांडणे लावण्याची एकही संधी सोडली नाही. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकदा शरद पवार यांनी तेच केले. शिवसेना नेत्यांची लायकी काढण्यापर्यंतची भाषा पवारांनी वापरली. सत्तेत सहभागी होण्याचे गुळ-खोबरे असलेले आमंत्रणाचे ताट शिवसेनेकडे भाजपाच्या नेत्याने पाठवले नव्हते. मात्र आपण सत्तेत गेलो नाही तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा कारभार चालेल आणि त्यात आपला पक्ष फुटेल या धास्तीने शिवसेना सत्तेत सहभागी झाली. नंतर दोघांनीही अत्यंत हुशारीने विरोधकांचीही जागा स्वत:कडे खेचून घेतली. आपल्या भांडाभांडीच्या खेळात नवी मुंबई, कल्याण डोंबीवली महापालिकेच्या जहागिऱ्या आपसुकच मिळाल्या, हे लक्षात येताच पुन्हा तोच खेळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा शिवसेनेने चालवला आहे.ही खेळी लक्षात येण्याइतके शरद पवार चाणाक्ष आहेत. त्यांनी म्हणूनच अस्तनीतले खास ‘संजयास्त्र’ बाहेर काढले. पवार आणि खा. संजय राऊत यांचे मधूर संबंध राज्यात सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे खा. राऊत यांनी नेमका बाण सोडला. औरंगाबादमध्ये संजय राऊत यांनी आमचा लढा निजामाच्या बापाशी असल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर बुडबुडे फुटायला लागले आहेत. महाराष्ट्रात बुडबुडे टिकत नाही. फक्त लाट टिकते आणि लाट शिवसेनेची आहे, असेही ते म्हणाले. याआधी मोदी सरकारला अफझलखानाची उपमा देण्याची शिक्षा किती भोगावी लागली होती, हे शिवसेना सत्तेत जाऊन विसरली असली तरी सत्तेबाहेर असलेल्या शरद पवार यांना त्याचा विसर पडलेला नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्याच निजामकालीन इतिहासाची संजयदृष्टी दाखवून दिली. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि खा. राऊतांच्या विधानावर भाजपाने ‘‘कुठे सूर्य, कुठे काजवा, त्या उद्धवला त्याची जागा समजवा’’ अशी पोस्टरबाजी सुरू केली.देशासाठी कसलेच योगदान न देणारे संकटांचा काय सामना करणार? देशाचे नाव जगभर उंचावणाऱ्या पंतप्रधानांवर टीका करणे हीच का मातोश्रीची शिकवण? अशी बोचरी टीका भाजपाने सुरू केली आणि पवारांचा हेतू साध्य झाला. सेना भाजपात जेवढी म्हणून भांडणे होतील तेवढी ती पवारांना हवीच आहेत. राष्ट्रवादीच्या तंबूत अनेक नाववाले वाघ असले तरी त्यातले काही जायबंदी आणि काही पिंजऱ्यात बंद आहेत. त्यामुळे आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी १७ व्या वर्षात आणि वयाच्या पंचाहत्तरीत पुन्हा पवारांच्या खांद्यावर आली आहे.राजकीय मासळीबाजारभाजपा-शिवसेनेचा घटस्फोट घडवून आणण्याची एकही संधी पवारांना सोडलेली नाही आणि सत्तेत राहून सरकारच्या विरोधात बोलण्याची संधी शिवसेनेनेही सोडलेली नाही. हा सगळा राजकीय मासळीबाजार पाहता मुंबईसाठी भाजपा-शिवसेनेने कोणती विकासाची कामे केली, हा सवालही कोणाच्या मनात येणारा नाही. तो तसा येऊ नये याची सोय आज विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादीनेच करून ठेवली आहे.