शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

याकूबनंतर आता सहा जणांचा खटला अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 1, 2015 04:45 IST

याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.

- अमर मोहिते, जयेश शिरसाट, मुंबईयाकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. सध्या मुस्तफा डोसा ऊर्फ मुस्तफा मजनू, अबू सालेम, ताहिर मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्यासह एकूण सात जणांविरोधात टाडा न्यायालयात खटला सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे. शिवाय रियाझ सिद्दिकी, अब्दुल कय्युम करीम शेख, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खानविरोधातही टाडा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापैकी सर्वांवरच बॉम्बस्फोटांचा कट रचणे, कटानुसार गुन्हेगारी कृत्य करणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. मात्र त्यातही डोसा, सालेम आणि ताहिर टकल्याची भूमिका आणि सहभाग जास्त असल्याचे सीबीआय सूत्रांकडून समजते. यापैकी सालेम, करिमुल्ला आणि फिरोज यांनी कबुलीजबाब दिला आहे.सीबीआयकडून ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार सालेमचे पोर्तुगालहून प्रत्यार्पण करण्यात आले होते. प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतातील कोणत्याही गुन्ह्यात देहदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही. त्यामुळे सालेमची मान फासातून निसटली होती. मात्र उर्वरित सहा आरोपींमधील डोसा, ताहिरचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना फाशी होऊ शकते, असे समजते. त्यामुळे याकूबनंतर या आरोपींपैकी कुणाचा नंबर लागतो, याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. सीबीआयने सातही आरोपींविरोधात पुरवणी आरोपत्र दखल केले आहे. तूर्तास टाडा न्यायालय फौजदारी दंड संहितेतील (सीआरपीसी) कलम ३१३ नुसार या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत. म्हणजेच सीबीआयने ठेवलेल्या आरोपांवर न्यायालय आरोपींना प्रश्न विचारते व त्या प्रश्नांवरील आरोपीने दिलेले उत्तर नोंदवून घेते. ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असून त्यानंतर बचाव पक्षाला त्यांच्या बाजूच्या साक्षीदारांची (डिफेन्स व्हिटनेस) साक्ष नोंदवण्याची मुभा दिली जाईल. बचाव पक्षाच्या साक्षीदारांचा पुरावा नोंदवून झाल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. तो पूर्ण झाल्यावर न्यायालय आरोपी दोषी आहे की नाही, हे जाहीर करेल. आरोपींना काय शिक्षा व्हावी, यावर दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतील. तो पूर्ण झाल्यावर न्यायालय आरोपींना शिक्षा ठोठावेल.