शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वे भाडेकपातीनंतर 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी

By admin | Updated: June 26, 2014 01:14 IST

रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई : रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. या भाडेवाढीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला मुंबईतून वर्षाला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. मात्र मुंबईकरांसाठी भाडेवाढीत कपात करण्याचा नव्याने निर्णय घेतल्यामुळे या दोन्ही रेल्वेला तब्बल 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वे अधिका:यांकडून सांगण्यात आले. 
पश्चिम रेल्वेला मेल-एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकलमधून 2012-13 मध्ये 2 हजार 618 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर मध्य रेल्वेलाही याच वर्षात 2 हजार 622 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. उपनगरीय लोकल सेवांमधून मध्य रेल्वेने 606 कोटी 3 लाख रुपये आणि पश्चिम रेल्वेने 561 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2013-14 मध्ये या दोन्ही रेल्वेची जवळपास एवढीच कमाई आहे. रेल्वेने नुकताच 100 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार होती. या नवीन भाडेवाढीची 25 जूनपासून अंमलबजावणी केली जाणार होती. या निर्णयामुळे लोकल सेवेच्या तिकीटदरात साधारण पाच रुपयांची वाढ होती. मात्र पासांचे दर  दुप्पट झाले होते. या दरवाढीमुळे पश्चिम रेल्वेला वर्षाला 1 हजार 100 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 1 हजार 300 कोटी रुपये वाढीव उत्पन्न मिळणार होते. मात्र 100 टक्के दरवाढीला विरोध करण्यात आल्यामुळे यात बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रलयाने घेतला. त्यानुसार 14.2 टक्के दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेच्या या निर्णयाचा मोठा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेलाच बसला. पश्चिम रेल्वेला आता साधारण 400 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 550 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.