शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

रेल्वे भाडेकपातीनंतर 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी

By admin | Updated: June 26, 2014 01:14 IST

रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई : रेल्वे मंत्रलयाने 25 जूनपासून 100 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. या भाडेवाढीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला मुंबईतून वर्षाला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. मात्र मुंबईकरांसाठी भाडेवाढीत कपात करण्याचा नव्याने निर्णय घेतल्यामुळे या दोन्ही रेल्वेला तब्बल 950 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वे अधिका:यांकडून सांगण्यात आले. 
पश्चिम रेल्वेला मेल-एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकलमधून 2012-13 मध्ये 2 हजार 618 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर मध्य रेल्वेलाही याच वर्षात 2 हजार 622 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. उपनगरीय लोकल सेवांमधून मध्य रेल्वेने 606 कोटी 3 लाख रुपये आणि पश्चिम रेल्वेने 561 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2013-14 मध्ये या दोन्ही रेल्वेची जवळपास एवढीच कमाई आहे. रेल्वेने नुकताच 100 टक्के दरवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार होती. या नवीन भाडेवाढीची 25 जूनपासून अंमलबजावणी केली जाणार होती. या निर्णयामुळे लोकल सेवेच्या तिकीटदरात साधारण पाच रुपयांची वाढ होती. मात्र पासांचे दर  दुप्पट झाले होते. या दरवाढीमुळे पश्चिम रेल्वेला वर्षाला 1 हजार 100 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 1 हजार 300 कोटी रुपये वाढीव उत्पन्न मिळणार होते. मात्र 100 टक्के दरवाढीला विरोध करण्यात आल्यामुळे यात बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रलयाने घेतला. त्यानुसार 14.2 टक्के दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वेच्या या निर्णयाचा मोठा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेलाच बसला. पश्चिम रेल्वेला आता साधारण 400 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेला 550 कोटी रुपये वाढीव उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.