शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

By admin | Updated: March 7, 2016 01:08 IST

एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला

पुणे : एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला. अखेर याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीकडे पाऊल टाकले. या नवीन अभ्यासक्रमाला अखेर ‘मुहूर्त’ लागला आहे. विद्यापरिषदेची महिन्याभरात मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. विद्यार्थी नक्की करतात तरी काय? अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना इतका वेळ लागतोच कसा? अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी नुकतीच विद्यार्थ्यांची कानउघाडणी करत विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता काही दिवसातच एफटीआयआयची २००८ व २००९ ची बॅच तब्बल आठ ते नऊ वर्षांनंतर संस्थेतून बाहेर पडणार असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तीन वर्षांच्या मर्यादित वेळेतच विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पडावेत, अशा नवीन अभ्यासक्रमाची रचना प्रशासनाने केली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि आवाका लक्षात घेत साडेतीन वर्षांच्या प्रयत्नातून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात अभ्यासक्रमाच्या निर्मित्तीत विद्यार्थ्यांचा सहभाग हा कदाचित पहिलाच प्रयोग ठरणार आहे.अभ्यासक्रमाच्या काहीशा किचकट प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत अडचणी येत आहेत. याकडे लक्ष वेधून अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलावे या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले.मात्र, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. एफटीआयआय ही संस्था १९६० मध्ये सुरू झाली. मात्र, १९७४ पासून या संस्थेचे कामकाज हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणानुसार चालते. ही एक स्वायत्त संस्था असल्याने वेळोवेळी गरजेनुसार या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. तरीही हा अभ्यासक्रम ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना पूर्ण करता आलेला नाही. उलट या वर्षांमध्ये दिवसागणिक वाढच होत गेली. या गोष्टीला एफटीआयआय प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा हे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी)नवीन विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली असून, लवकरच त्याचा निकालही लागणार आहे. महिन्याभरात विद्या परिषदेची अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल, त्यानंतर जुलैपासून हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.- उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय