शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अभ्यासक्रमास अखेर ‘मुहूर्त’

By admin | Updated: March 7, 2016 01:08 IST

एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला

पुणे : एफटीआयआयच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला लागणाऱ्या प्रदीर्घ कालावधीमुळे विद्यार्थ्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यात दोष कुणाचा? यावरून विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये ‘कलगीतुरा’ देखील रंगला. अखेर याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीकडे पाऊल टाकले. या नवीन अभ्यासक्रमाला अखेर ‘मुहूर्त’ लागला आहे. विद्यापरिषदेची महिन्याभरात मान्यता मिळाल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. विद्यार्थी नक्की करतात तरी काय? अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना इतका वेळ लागतोच कसा? अशा शब्दातं ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी नुकतीच विद्यार्थ्यांची कानउघाडणी करत विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता काही दिवसातच एफटीआयआयची २००८ व २००९ ची बॅच तब्बल आठ ते नऊ वर्षांनंतर संस्थेतून बाहेर पडणार असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तीन वर्षांच्या मर्यादित वेळेतच विद्यार्थी संस्थेमधून बाहेर पडावेत, अशा नवीन अभ्यासक्रमाची रचना प्रशासनाने केली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि आवाका लक्षात घेत साडेतीन वर्षांच्या प्रयत्नातून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात अभ्यासक्रमाच्या निर्मित्तीत विद्यार्थ्यांचा सहभाग हा कदाचित पहिलाच प्रयोग ठरणार आहे.अभ्यासक्रमाच्या काहीशा किचकट प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत अडचणी येत आहेत. याकडे लक्ष वेधून अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलावे या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले.मात्र, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. एफटीआयआय ही संस्था १९६० मध्ये सुरू झाली. मात्र, १९७४ पासून या संस्थेचे कामकाज हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणानुसार चालते. ही एक स्वायत्त संस्था असल्याने वेळोवेळी गरजेनुसार या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. तरीही हा अभ्यासक्रम ठराविक वेळेत विद्यार्थ्यांना पूर्ण करता आलेला नाही. उलट या वर्षांमध्ये दिवसागणिक वाढच होत गेली. या गोष्टीला एफटीआयआय प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा हे कारण देण्यात आले. (प्रतिनिधी)नवीन विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली असून, लवकरच त्याचा निकालही लागणार आहे. महिन्याभरात विद्या परिषदेची अभ्यासक्रमाला मान्यता मिळेल, त्यानंतर जुलैपासून हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.- उत्तमराव बोडके, कुलसचिव, एफटीआयआय