शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लष्करी हल्ल्यानंतर नेटिझन्समध्ये राष्ट्रभक्तीचे उधाण

By admin | Updated: September 30, 2016 03:50 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी

मुंबई : उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधानांनीही दखल घ्यावी इतपत आक्रोश व्यक्त करणाऱ्या आणि सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याचे संयमी धोरण जाहीर केल्यावर नाराज झालेल्या नेटिझन्समध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’नंतर मात्र गुरुवारी राष्ट्रभक्तीचे उधाण आले. उरीच्या हल्लेखोरांना चोख उत्तर देण्याचे वचन सरकारने पाळल्याबद्दल समाधान व्यक्त करीत असतानाच समाजमाध्यमांमधून लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.गुरुवारचा संपूर्ण दिवस टिष्ट्वटरवर ‘हॅशटॅग सर्जिकल स्ट्राईक’ हा ट्रेंड राहिला आणि रात्रीपर्यंत ‘इंडियन आर्मी’चे अभिनंदन करणाऱ्या टष्ट्वीट्सची संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली. एकंदर फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपवरवर आलेल्या यासारख्या असंख्य नोटिफीकेशन आणि चित्र-संदेशांनी नेटिझन्सचे मोबाईल खणखणत राहिल्याने भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत होते.उरी हल्ल्याबाबत प्रचंड हळहळ व्यक्त करणाऱ्या नेटिझन्समध्ये स्ट्राईक्सचे वृत्त समजताच अभिमानाची आणि अभिनंदनाची भावना जागृत झाली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत स्ट्राईकची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. (प्रतिनिधी)बॉलिवूडमध्येही आनंदभारतीय जवानांच्या पाठीवर बॉलिवूडनेही शाबासकीची थाप दिली. नेटिझन्स म्हणून सक्रिय असलेल्या बॉलिवूडच्या अनेक मान्यवरांनी अभिनंदन, कौतूक आणि समाधानाची भावना व्यक्त केली. बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरु ख याने कौतुक करताना म्हटले की, भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे. भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात कारवाई केली, त्याबद्दल धन्यवाद ! जवानांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी मी प्रार्थना करेन. शाहरु खसह, आशा भोसले, वरु ण धवन यांनी देखील भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.‘दसऱ्या आधी सीमोल्लंघन करत दिवाळी आधीच फटाके फोडल्याने भारतीय सैन्याचे खुप खुप आभार, अशा शब्दांत नेटिझन्सने शुभेच्छा देत लष्कराचे अभिनंदन केले. शिवाय काही नेटिझन्सनी आपल्या डिपीमध्ये तिरंग्याला सलाम करणाऱ्या सैनिकांच्या छायाचित्राला स्थान दिले. तर काही नेटिझन्समध्ये ‘पाकमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात-पंतप्रधानांची घोषणा...’ अशा स्वरुपात पाकची खिल्ली उडवणारे संदेश व्हायरल झाले. नेते, अभिनेते, खेळाडू या सर्वांनी आपआपल्या पद्धतीने सोशल मिडियावर व्यक्त होत भारतीय सैन्याचे कौतुक केले.