शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

लोकमतच्या वृत्तानंतर जळगावात २२०० फेरपरीक्षा उत्तीर्ण विदयार्थ्यांना मिळाला प्रवेश

By admin | Updated: September 22, 2016 20:39 IST

१० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ : १० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे. यासंदर्भामध्ये ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. १० वीमध्ये फेरपरीक्षेत ११०८ आणि १२ वीमध्ये ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आॅगस्टमध्ये निकाल जाहीर झाले होते. परंतु शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले, फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागांचा प्रश्न यामुळे प्रवेश मिळत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने दोनवेळा वृत्त प्रसिद्ध करून हा मुद्दा उपस्थित केला. त्यात १० वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण संचालकांनी जि.प.ला पत्र दिले होते. तर उच्च शिक्षण संचालनालयानेही १३ वीच्या वर्गांसाठी १० टक्के जागा वाढविण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते. यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व जि.प.च्या अखत्यारितील उच्च माध्यमिक विद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. १० सप्टेंबर २०१६ पर्यंत १३ वीच्या वर्गात १२ वीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असून, १३ वीमध्ये ११०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची माहिती आहे. तर १० वीच्या सर्व ११०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. संबंधित विद्यालयांनी तशी नोंदणी केल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला.