शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

लोकमतच्या वृत्तानंतर जळगावात २२०० फेरपरीक्षा उत्तीर्ण विदयार्थ्यांना मिळाला प्रवेश

By admin | Updated: September 22, 2016 20:39 IST

१० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ : १० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे. यासंदर्भामध्ये ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. १० वीमध्ये फेरपरीक्षेत ११०८ आणि १२ वीमध्ये ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आॅगस्टमध्ये निकाल जाहीर झाले होते. परंतु शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले, फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागांचा प्रश्न यामुळे प्रवेश मिळत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने दोनवेळा वृत्त प्रसिद्ध करून हा मुद्दा उपस्थित केला. त्यात १० वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण संचालकांनी जि.प.ला पत्र दिले होते. तर उच्च शिक्षण संचालनालयानेही १३ वीच्या वर्गांसाठी १० टक्के जागा वाढविण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते. यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व जि.प.च्या अखत्यारितील उच्च माध्यमिक विद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. १० सप्टेंबर २०१६ पर्यंत १३ वीच्या वर्गात १२ वीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असून, १३ वीमध्ये ११०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची माहिती आहे. तर १० वीच्या सर्व ११०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. संबंधित विद्यालयांनी तशी नोंदणी केल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला.