शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

लोकमतच्या वृत्तानंतर जळगावात २२०० फेरपरीक्षा उत्तीर्ण विदयार्थ्यांना मिळाला प्रवेश

By admin | Updated: September 22, 2016 20:39 IST

१० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ : १० वी आणि १२ वीच्या वर्गात फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २२०० विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याची माहिती आहे. यासंदर्भामध्ये ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. १० वीमध्ये फेरपरीक्षेत ११०८ आणि १२ वीमध्ये ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आॅगस्टमध्ये निकाल जाहीर झाले होते. परंतु शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झाले, फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागांचा प्रश्न यामुळे प्रवेश मिळत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने दोनवेळा वृत्त प्रसिद्ध करून हा मुद्दा उपस्थित केला. त्यात १० वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण संचालकांनी जि.प.ला पत्र दिले होते. तर उच्च शिक्षण संचालनालयानेही १३ वीच्या वर्गांसाठी १० टक्के जागा वाढविण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले होते. यानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये व जि.प.च्या अखत्यारितील उच्च माध्यमिक विद्यालयांना, कनिष्ठ महाविद्यालयांना जागा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. १० सप्टेंबर २०१६ पर्यंत १३ वीच्या वर्गात १२ वीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असून, १३ वीमध्ये ११०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची माहिती आहे. तर १० वीच्या सर्व ११०८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. संबंधित विद्यालयांनी तशी नोंदणी केल्याचा दावा माध्यमिक शिक्षण विभागाने केला.