शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

मराठा आरक्षणावरील सुनावणी दसऱ्यानंतर

By admin | Updated: October 1, 2016 03:23 IST

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व समर्थन करणाऱ्या याचिकांमध्ये आणखी काही जणांनी मध्यस्थी केल्याने उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना त्यांची

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व समर्थन करणाऱ्या याचिकांमध्ये आणखी काही जणांनी मध्यस्थी केल्याने उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना त्यांची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे निर्देश देत या याचिकांवरील पुढील सुनावणी १३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केली. आता विजयादशमीनंतर यावर सुनावणी होणार आहे.मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने २०१४मध्येच भूमिका स्पष्ट केली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. मात्र या याचिकांमध्ये नव्याने मध्यस्थी अर्ज करणाऱ्यांनी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले म्हणणे मांडायचे असल्याने काही दिवस मुदत द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवादाद्यांना त्यांचे सर्व मुद्दे लेखी स्वरूपात तयार ठेवावेत, त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रही सादर करावे, असे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी १३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)मुंबईतील महामोर्चा दिवाळीनंतरचमुंबईतील महामोर्चा दिवाळीनंतर; परंतु विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक संघटनांच्या अनेक याचिकाशासनाने मराठा व मुस्लीम समाजाला अनुक्रमे १६ व ५ टक्के आरक्षण सरकारी नोकरी व शिक्षणामध्ये देण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करणारा आहे. त्याशिवाय राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर व अन्य अनेक संघटनांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. तर राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठीही अनेक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.2014 मध्ये उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती दिली होती. त्याविरुद्ध सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र उच्च न्यायालयाने निर्णयावर दिलेली स्थगिती हटवण्यास नकार देत पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.