शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील सुनावणी दसऱ्यानंतर

By admin | Updated: October 1, 2016 03:23 IST

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व समर्थन करणाऱ्या याचिकांमध्ये आणखी काही जणांनी मध्यस्थी केल्याने उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना त्यांची

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व समर्थन करणाऱ्या याचिकांमध्ये आणखी काही जणांनी मध्यस्थी केल्याने उच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना त्यांची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे निर्देश देत या याचिकांवरील पुढील सुनावणी १३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केली. आता विजयादशमीनंतर यावर सुनावणी होणार आहे.मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने २०१४मध्येच भूमिका स्पष्ट केली असल्याची माहिती खंडपीठाला दिली. मात्र या याचिकांमध्ये नव्याने मध्यस्थी अर्ज करणाऱ्यांनी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले म्हणणे मांडायचे असल्याने काही दिवस मुदत द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर खंडपीठाने सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवादाद्यांना त्यांचे सर्व मुद्दे लेखी स्वरूपात तयार ठेवावेत, त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रही सादर करावे, असे निर्देश देत या याचिकांवरील सुनावणी १३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब केली. (प्रतिनिधी)मुंबईतील महामोर्चा दिवाळीनंतरचमुंबईतील महामोर्चा दिवाळीनंतर; परंतु विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक संघटनांच्या अनेक याचिकाशासनाने मराठा व मुस्लीम समाजाला अनुक्रमे १६ व ५ टक्के आरक्षण सरकारी नोकरी व शिक्षणामध्ये देण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करणारा आहे. त्याशिवाय राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर व अन्य अनेक संघटनांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे. तर राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठीही अनेक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.2014 मध्ये उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती दिली होती. त्याविरुद्ध सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र उच्च न्यायालयाने निर्णयावर दिलेली स्थगिती हटवण्यास नकार देत पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.