शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

प्रदर्शनानंतरही 'ए दिल...' ची मुश्किल कायम

By admin | Updated: October 28, 2016 13:50 IST

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल...'ची प्रदर्शनानंतरही मुश्किल कायम आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला असला तरी देशभरात विविध संघटनांकडून सिनेमाविरोधात निदर्शनं सुरू आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 28 - दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल...'ची मुश्किल प्रदर्शनानंतरही कायम आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान याच्या सिनेमातील सहभागामुळे 'ए दिल है मुश्किल' सिनेमा वादात अडकला होता. आज हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला असला तरी देशभरात विविध संघटनांकडून सिनेमाविरोधात निदर्शनं सुरू आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 
 
 
 
कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये संभाजी ब्रिगेडने 'ए दिल है मुश्किल' सिनेमाविरोधात निदर्शनं केली.  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सिनेमाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजीदेखील केली. 

कोल्हापूरमधील राजारामपुरी परिसरातील पार्वती मल्टिप्लेक्सबाहेर पतित पावन संघटनेनंही सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली. जोरदार निदर्शनांमुळे सिनेमागृहाने 'ए दिल है मुश्किल'चा खेळ बंद केला.

बिहारमध्येही सिनेमागृहांबाहेर काही संघटनांनी निषेध व्यक्त करत दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचे पोस्टर जाळले.
नवी दिल्लीतील सिनेमागृहांबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत 38 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी वातावरण तापले व पाकच्या कुरापती थांबेपर्यंत कोणताही पाकिस्तानी खेळाडू, कलाकार, अभिनेता यांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच त्यांच्यासोबत कोणीही काम करू नये अशी भूमिका राजकीय पक्षांनी मांडली. 
आणखी बातम्या
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रदर्शनास तीव्र विरोध दर्शवला. या मुद्यावर बराच काळ चर्वितचर्वण झाल्यानंतर अखेर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राज यांनी काही अटी घालत सिनेमाला केलेला विरोध मागे घेतला. अखेर आज हा सिनेमा प्रदर्शित झाला असला तरी त्यासमोरील अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत असेच दिसते.