शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पाडव्यानंतर कर्जमाफीचा संघर्ष रस्त्यावर

By admin | Updated: March 26, 2017 02:58 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी २९ मार्चपासून पुकारलेल्या संघर्ष यात्रेतील हवा काढून घेण्यासाठी १९ आमदारांचे निलंबन दोन

अतुल कुलकर्णी / मुंबईकाँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी २९ मार्चपासून पुकारलेल्या संघर्ष यात्रेतील हवा काढून घेण्यासाठी १९ आमदारांचे निलंबन दोन टप्प्यांत मागे घेण्याच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. मात्र ही यात्रा शेतकरी कर्जमाफीसाठी आहे, आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी नाही, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपाइं (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएम अशा सर्व विरोधकांनी एकत्र येऊन २९ मार्च ते ४ एप्रिल असा संघर्ष यात्रेचा कार्यक्रमच जाहीर केला. २९ मार्चला सकाळी पळसगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथून संघर्ष यात्रा सुरू होईल. ही यात्रा निघणार हे वृत्त सगळ्यात आधी ‘लोकमत’ने दिले होते.चर्चेच्या फेऱ्यात विरोधकांना गुंतवून ठेवायचे आणि २९ मार्चपासून सुरू होणारी विरोधकांची संघर्ष यात्रा निघू द्यायची नाही, यासाठी पडद्याआड शनिवारी मोठी खलबते रंगली. मात्र संघर्ष यात्रेवर ठाम असणाऱ्या विरोधकांनी त्याचा कार्यक्रमच जाहीर केल्याने पाडव्यानंतर विधिमंडळात आणि रस्त्यावर नवा संघर्ष उभा राहणार आहे. अधिवेशन चालू असताना असा संघर्ष या सरकारच्या काळात पहिल्यांदाच घडणार आहे.बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी शरद पवार यांनी काढली होती, तर जनता पक्षाच्या विरोधात दिवंगत इंदिरा गांधी यांनी विदर्भातून शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती. गोपीनाथ मुंडे यांनी आघाडी सरकारच्या विरोधात गोदा परिक्रमा काढली होती. विशेष म्हणजे या तीनही आंदोलनांमुळे त्या त्या सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यात यश मिळाले होते. शेतकरी दिंडीनंतर अंतुलेंना सत्तेतून बाहेर पडावे लागले तर इंदिरा गांधींच्या यात्रेनंतर जनता पक्षाचे सरकार बरखास्त झाले होते. विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली व त्यातून सरकारविरोधी वातावरण तयार झाले तर ते मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपाला अडचणीचे ठरेल, असा सूर भाजपाच्या काही नेत्यांनी लावला. अर्थसंकल्प मंजूर होण्याच्या आधी निलंबन रद्द केले आणि विरोधकांनी शिवसेनेच्या मदतीने सभागृहात अर्थसंकल्पाच्या विरोधात मतदान केले तर अडचण होईल, अशी भूमिका अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मांडल्याने भाजपातही यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. मात्र हे चित्र बाहेर जाऊ न देता विरोधकांमधे भांडणे कशी लागतील याचे नियोजन केले गेले.कामकाजात सहभागी होणे, ही वेगळी बाब आहे आणि संघर्ष यात्रा काढणे हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. कर्जमाफी मागणाऱ्या आमदारांना सरकार निलंबित करते, मुख्यमंत्र्यांच्या दालनात न्याय मागण्यास गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करते. आम्ही ठरल्याप्रमाणे संघर्ष यात्रा काढणार आहोत.- आ. जयंत पाटील, गटनेते, राष्ट्रवादी

 

सरकार आमच्याशी कसे वागते ते महत्त्वाचे नाही. पण ते शेतकऱ्यांशीही दुटप्पीपणे वागत आहे. हे जनतेत जाऊन सांगण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेदिवसभर निर्णयहीन बैठकांचा रतीबसभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात शनिवारी सकाळी बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ. संजय दत्त, आ. शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती. दोन टप्प्यांत निलंबन मागे घेऊ पण कामकाजात सहभागी व्हा, असा प्रस्ताव त्यात सरकारने मांडला. माझ्या पक्षात माझ्यावरही निलंबन रद्द करू नये, असा दबाव आहे. पण यातून मार्ग काढला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. मात्र त्याला विरोधकांनी नकार दिला.पुन्हा दुपारी विखे पाटील यांच्या दालनात विरोधकांची बैठक झाली. त्या वेळी उपरोक्त सदस्यांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटीलही सहभागी झाले. ही चर्चा सुरू असताना तेथे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आले. शनिवारी दिवसभर बैठकांचे रतीब घातले गेले पण एकाही बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला निघून गेले तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शुक्रवारीच संघर्ष यात्रेचे नियोजन करून पुण्याकडे रवाना झाले.ना घर का ना घाट का...काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटून भाजपात येण्यास तयार असल्याचे सांगत विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा यामागे हेतू होता. विरोधी आमदारांना राजीनामे देऊन त्यांना निवडून आणायचे असेल, तर तेथील भाजपा-सेनेच्या दोन नंबरच्या नेत्यांचे काय? त्यांना कसे गप्प करायचे? विरोधकांनी एकास एक उमेदवार देण्याची भूमिका घेतली आणि त्यातून आमदारांचा पराभव झाला तर त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होईल. त्यांचे पुनर्वसन कसे आणि कुठे करणार? असे अनेक प्रश्न शनिवारी भाजपाचे आमदार उपस्थित करत होते.भाजपाची रणनीती निलंबन दोन टप्प्यांत रद्द होईल. तुम्ही नावे द्यावीत असे सुचवायचे. विरोधकांमध्ये त्यातून फूट पाडायची आणि त्यांनीच नावे दिली नाहीत, त्याला आम्ही काय करणार? असे सांगत सरकारने ३१पर्यंत कामकाज चालवून शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा, अशी रणनीती आहे.काँग्रेसमध्ये विखेंच्या भूमिकेवरून वादविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपाला पूरक भूमिका घेतात. त्यामुळे पक्ष अडचणीत येतो, असे सांगून काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी मागणी दिल्लीत केली आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी भाजपापुढे नमते न घेता संघर्ष यात्रेसाठी स्वत:च्या निवासस्थानी कार्यालय उघडले.