शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

By admin | Updated: September 5, 2014 23:36 IST

निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे.

ठाणो : हरतालिका गणोशचतुर्थी आणि गौरी स्थापना यावेळी मुळातच आवक कमी व अपु:या आवकेतील निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे. 
एकीकडे मागणी घटली आणि आहे त्या आवकेत वाढ झाली यामुळे ही घट घडून आली आहे. त्यामुळे जो एक फुटी हार 4क् रुपयांना मिळत होता तो आता 2क् रुपयांवर आला आहे. चायनीज गुलाबाच्या 1क् ते 12 फुलांची जूडी 2क् ते 3क् रुपयांना होती ती आता 1क् ते 15 रुपयांवर आली आहे. गावठी लाल गुलाबाची जूडी 25 ते 35 रुपये होती. ती आता 1क् ते 15 रुपयांना आहे. 2क् ते 25 रुपयाचा गजरा आता 5 ते 1क् रुपयांना आहे. लीली आणि निशिगंध यांचे मध्यम आणि मोठय़ा उंचीचे हार देखील 6क् ते 8क् रुपयांऐवजी आता 4क् रुपयांवर आले आहेत. कमवायचे दिवस होते. तेव्हा कमावले. आता रुटीन धंदा सुरु झाला आहे. अशी भाषा फुलविक्रेते करीत आहेत. 5 रुपयांना मिळणारी 21 दुर्वाची जूडी आता 2 ते 3 रुपयांना झाली आहे. 5 रुपयाला एक असणारे जास्वंद आता 1क् रुपयांना 3 ते 4 नग मिळू लागले आहेत. सोनचाफा जो 5 आणि 7 रुपयांना होता तो आता 2 रुपये नगावर आला आहे. जास्वंदीच्या 5 ते 7 कळ्यांचा वाटा आता 1क् रुपयाला मिळू लागला आहे. एकाच वेळी सुटय़ा विक्रीसाठी आणि हारांसाठी कंठी, गजरे, वेण्या यासाठी फुलांची मागणी वाढल्याने त्याचा फायदा विक्रेत्यांनी करून घेतला. असे बाजारातील जाणकारांचे म्हणणो आहे. अनेकांनी पूजा साहित्यासाठी लागणा:या फुलांची उपलब्धता सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी थोडी-थोडी आणि टप्प्या-टप्प्यात केल्यामुळे विक्रेत्यांकडे माल असूनही बाजारात टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले. असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या आवक जरी वाढली असली तरी ती गरजे इतकीच आहे. परंतु घराघरातील गौरी गणपतींचे विसजर्न झाल्याने तात्कालीक मागणी घटली. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
गणोश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कल्याणच्या फुल बाजारात 1क्5 टन फुले आली. तर गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी केवळ 37 टन फुले बाजारात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
फूल विक्रेते व्यापारी असोशिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले की,  पावसामुळे बाजार पडला. अनेक व्यापा:यांवर निम्म्यांपेक्षा जास्त माल फेकून देण्याची वेळ आली. त्यांचे नुकसान झाले. गणोशोत्सव व त्यातच मालाची आवक कमी झाल्याने परिणामी किंमती वाढल्या. 
बटन गुलाब 2क् नगाचा एक गुच्छ 3क् ते 4क् रूपये दराने विकला  जात होता आता त्यांची किंमत कमी होऊन तो 25 रू.ना ग्राहकांना मिळत आहे. जरबेरा 8क् रू.  वरून आता 3क् ते 4क् रू. ना मिळत आहे.  फूल विक्रेते गुरनाथ पारनेर यांनी सांगितले की, गौरी विसजर्नाच्या दिवशी लिलीचा चमकी गुंफलेला हार एक हजार रू. किंमतीला विकला गेला. तर गुलाब व लिलीच्या पाकळयांचा हार 4क्क् रू. किंमतीला विकला गेला. 45 रूपयांपासून एक हजार रूपयार्पयत हारांच्या किंमती होत्या. 45 रू.चा  हार आता 25 रू. ना मिळत आहे. तर निशिगंधचा मोठा हार 25क् ते 3क्क् रू. ला मिळत होता. ही फूल महाग असल्याने हा हार आजही त्याच भावाने विकला जात आहेत.  
दादरला फुलांची मोठी बाजारपेठ आहे. कल्याण,कसारा आणि कजर्त परिसरातील फूल विक्रेते दादरला जात. कल्याणला सात विक्रेत्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. कल्याण बाजार समितीत फूल मार्केट सुरू झाले. सात विक्रेत्यावरून फुल विक्रेत्यांचा संख्या आज मितीस 354 वर पोहचली आहे. जुन्नर, आळेफाटा, बोटा, अकोला, पुणो, बारामती, डहाणू, वसई आणि बंगलोरहून माल येतो.