शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

गौरी विसजर्नानंतर फुल बाजार घसरला

By admin | Updated: September 5, 2014 23:36 IST

निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे.

ठाणो : हरतालिका गणोशचतुर्थी आणि गौरी स्थापना यावेळी मुळातच आवक कमी व अपु:या आवकेतील निम्मा माल पावसामुळे सडल्याने आभाळाला भिडलेले फुल आणि हारांचे भाव गौरी विसजर्न होताच 40 टक्क्यांनी घटले आहे. 
एकीकडे मागणी घटली आणि आहे त्या आवकेत वाढ झाली यामुळे ही घट घडून आली आहे. त्यामुळे जो एक फुटी हार 4क् रुपयांना मिळत होता तो आता 2क् रुपयांवर आला आहे. चायनीज गुलाबाच्या 1क् ते 12 फुलांची जूडी 2क् ते 3क् रुपयांना होती ती आता 1क् ते 15 रुपयांवर आली आहे. गावठी लाल गुलाबाची जूडी 25 ते 35 रुपये होती. ती आता 1क् ते 15 रुपयांना आहे. 2क् ते 25 रुपयाचा गजरा आता 5 ते 1क् रुपयांना आहे. लीली आणि निशिगंध यांचे मध्यम आणि मोठय़ा उंचीचे हार देखील 6क् ते 8क् रुपयांऐवजी आता 4क् रुपयांवर आले आहेत. कमवायचे दिवस होते. तेव्हा कमावले. आता रुटीन धंदा सुरु झाला आहे. अशी भाषा फुलविक्रेते करीत आहेत. 5 रुपयांना मिळणारी 21 दुर्वाची जूडी आता 2 ते 3 रुपयांना झाली आहे. 5 रुपयाला एक असणारे जास्वंद आता 1क् रुपयांना 3 ते 4 नग मिळू लागले आहेत. सोनचाफा जो 5 आणि 7 रुपयांना होता तो आता 2 रुपये नगावर आला आहे. जास्वंदीच्या 5 ते 7 कळ्यांचा वाटा आता 1क् रुपयाला मिळू लागला आहे. एकाच वेळी सुटय़ा विक्रीसाठी आणि हारांसाठी कंठी, गजरे, वेण्या यासाठी फुलांची मागणी वाढल्याने त्याचा फायदा विक्रेत्यांनी करून घेतला. असे बाजारातील जाणकारांचे म्हणणो आहे. अनेकांनी पूजा साहित्यासाठी लागणा:या फुलांची उपलब्धता सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी थोडी-थोडी आणि टप्प्या-टप्प्यात केल्यामुळे विक्रेत्यांकडे माल असूनही बाजारात टंचाई असल्याचे चित्र निर्माण झाले. असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या आवक जरी वाढली असली तरी ती गरजे इतकीच आहे. परंतु घराघरातील गौरी गणपतींचे विसजर्न झाल्याने तात्कालीक मागणी घटली. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
गणोश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कल्याणच्या फुल बाजारात 1क्5 टन फुले आली. तर गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी केवळ 37 टन फुले बाजारात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
फूल विक्रेते व्यापारी असोशिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले की,  पावसामुळे बाजार पडला. अनेक व्यापा:यांवर निम्म्यांपेक्षा जास्त माल फेकून देण्याची वेळ आली. त्यांचे नुकसान झाले. गणोशोत्सव व त्यातच मालाची आवक कमी झाल्याने परिणामी किंमती वाढल्या. 
बटन गुलाब 2क् नगाचा एक गुच्छ 3क् ते 4क् रूपये दराने विकला  जात होता आता त्यांची किंमत कमी होऊन तो 25 रू.ना ग्राहकांना मिळत आहे. जरबेरा 8क् रू.  वरून आता 3क् ते 4क् रू. ना मिळत आहे.  फूल विक्रेते गुरनाथ पारनेर यांनी सांगितले की, गौरी विसजर्नाच्या दिवशी लिलीचा चमकी गुंफलेला हार एक हजार रू. किंमतीला विकला गेला. तर गुलाब व लिलीच्या पाकळयांचा हार 4क्क् रू. किंमतीला विकला गेला. 45 रूपयांपासून एक हजार रूपयार्पयत हारांच्या किंमती होत्या. 45 रू.चा  हार आता 25 रू. ना मिळत आहे. तर निशिगंधचा मोठा हार 25क् ते 3क्क् रू. ला मिळत होता. ही फूल महाग असल्याने हा हार आजही त्याच भावाने विकला जात आहेत.  
दादरला फुलांची मोठी बाजारपेठ आहे. कल्याण,कसारा आणि कजर्त परिसरातील फूल विक्रेते दादरला जात. कल्याणला सात विक्रेत्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. कल्याण बाजार समितीत फूल मार्केट सुरू झाले. सात विक्रेत्यावरून फुल विक्रेत्यांचा संख्या आज मितीस 354 वर पोहचली आहे. जुन्नर, आळेफाटा, बोटा, अकोला, पुणो, बारामती, डहाणू, वसई आणि बंगलोरहून माल येतो.