शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर

By admin | Updated: August 12, 2016 11:39 IST

सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 - सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं. पहाटे 5 वाजता मध्य रेल्वेच्या संतप्त प्रवाशांनी आंदोलनास सुरुवात केली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, प्रवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच प्रवाशांनी सकाळी 11 च्या सुमारास पहिली  रेल्वे मुंबईकडे सोडली.
 
संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकात लोकल अडवल्याने अगोदरच विस्कळीत झालेल्या लोकल सेवेवर परिणाम झाला होता. बदलापूरकरांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे आता दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह इतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
 
भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आली. यामुळे बदलापूरमधील संतप्त प्रवाशांनी स्टेशनवरच लोकल रोखली, आणि स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. गाडी वेळेवर येईल असं लिहून देण्याची मागणी प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे केली आहे. संतप्त प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी लोकलही रोखली असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे.
 
(छायाचित्र - महेश मोरे)
 
 
दरम्यान प्रवाशांनी लोकलच्या केबिनचा ताबा घेतला आहे. प्रवाशांचा उद्रेक पाहून सीएसटी - कर्जत गाडीचा मोटरमनही पळून गेला आहे.
 
प्रवाशांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून बदलापूर पोलीस स्थानकावर पोहोचले आहे. गेल्या तीन तासांपासून मध्य रेल्वे लोकल सेवेवर परिणाम झाला असल्याचं दिसत आहे.
 

 

एक्स्प्रेस सेवचाही झाला खोळंबा

दरम्यान बदलापूर स्टेशनवर झालेल्या रेलरोकोमुळे एक्स्प्रेस सेवेचाही खोळंबा झाला आहे. महालक्ष्मी, सिद्धेश्वर, इंद्रायणी या एक्स्प्रेस स्टेशनवर थांबवण्यात आल्या असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.