शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

40 वर्षाच्या लढय़ानंतर शहिदाच्या पत्नीला मिळणार भूखंड

By admin | Updated: August 6, 2014 03:10 IST

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि या दंडातून किमतीचे पैसे वळते करून घेऊन इंदिरा यांना रत्नागिरी येथे घरासाठी पाच गुंठय़ाचा भूखंड देण्याचा आदेश दिला.

मुंबई : 1965च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जवान बाबाजी जाधव यांची विधवा पत्नी इंदिरा शासकीय योजनेनुसार भूखंड मिळण्यास पात्र असूनही तिला त्यासाठी तब्बल 40 वर्षे झगडायला लावल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि या दंडातून किमतीचे पैसे वळते करून घेऊन इंदिरा यांना रत्नागिरी येथे घरासाठी पाच गुंठय़ाचा भूखंड देण्याचा आदेश दिला.
भूखंडाची किंमत वसूल केल्यावर दंडातील जी रक्कम शिल्लक राहील ती इंदिरा यांच्या बँक खात्यात जमा करावी, असा आदेशही न्या. अभय ओक व न्या. ए.एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने दिला. शिवाय इंदिरा  यांना भूखंड देण्यात दिरंगाई करणा:या अधिका:यांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मुभाही न्यायालयाने शासनास दिली.
तसेच घराच्या या भूखंडाखेरीज इंदिरा जाधव या नियमानुसार शेतीसाठी 1क् एकरचा स्वतंत्र भूखंड मिळण्यासही पात्र असल्याने असा भूखंड देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू करावी़ यासाठी संबंधित जिल्हाधिका:यांनी इंदिरा यांच्याकडून अर्ज भरून घ्यावा व त्यावर सहा आठवडय़ांत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आह़े
इंदिरा यांना घरासाठी मिळणारा भूखंड  1998च्या बाजारभावाप्रमाणो अध्र्या किमतीत मिळणार आह़े त्याची अंदाजे किंमत 4क् हजार रुपये आह़े या भूखंडासाठी गेली 4क् वर्षे इंदिरा प्रयत्न करत होत्या़ आता इंदिरा यांचे वय 74 वर्षे असून, आजारी असल्याने पुणो येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़
याचा विचार करत खंडपीठाने शासनाच्या दिरंगाईच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ एवढेच नव्हे, तर भविष्यात शहीद जवानांच्या वारसांना त्रस होणार नाही यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुख्य सचिवांना दिले आहेत़ यासाठी मुख्य सचिव नक्कीच काहीतरी ठोस नियम  करतील जेणोकरून शहिदांच्या कुटुंबीयांना हक्कासाठी भांडावे लागणार नाही, असा विश्वासही न्यायालयाने व्यक्त केला. (प्रतिनिधी) 
 
च्जवान बाबाजी शहीद झाल्यानंतर इंदिरा यांना भूखंड द्यावा असे 1967पासून लष्कराकडून महाराष्ट्र शासनाला सांगितले जात होत़े त्याची दखल घेत 1994मध्ये सरकारने इंदिरा यांना खेडमधील एक भूखंड दाखवला होता़ मात्र तो भूखंड निजर्नस्थळी असल्याने त्यांनी नाकारला़ त्यानंतर सरकारने भूखंड देण्याची कोणतीच प्रक्रिया केली नाही़ अखेर यासाठी इंदिरा यांनी अॅड़ अविनाश गोखले व अॅड़ मयूरेश मोदगी यांच्यामार्फत याचिका दाखल केली़ 
च्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वारंवार फटकारल्यानंतर सरकारने इंदिरा यांना भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू केली़ पण किंमत काय आकारायची यावरून शासनाने वाद घातला. मुख्य म्हणजे इंदिरा यांना विनामूल्य भूखंड देण्यास सरकारचा विरोध होता. अखेर न्यायालयाने वरीलप्रमाणो आदेश देऊन इंदिरा यांना एक प्रकारे विनामूल्य भूखंड मिळेल, अशी व्यवस्था केली.