शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मिठागर जमिनीवर परवडणारी घरे

By admin | Updated: October 22, 2016 01:33 IST

मुंबई आणि परिसरातील मिठागारांची जमीन तसेच स्वत:च्या मालकीची जमीन परवडणाऱ्या घरांच्या योजना उभारण्यासाठी देण्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

मुंबई : मुंबई आणि परिसरातील मिठागारांची जमीन तसेच स्वत:च्या मालकीची जमीन परवडणाऱ्या घरांच्या योजना उभारण्यासाठी देण्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज अनुकूलता दर्शविली. या योजनेचा वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी येथे दिले. पश्चिम क्षेत्रीय परिषदेची बैठक राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे राज्यातील मंत्री, दमण दिव दादरा नगर हवेलीचे प्रशासक, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते. मुंबई महानगरामध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी केंद्राच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी सहमती दर्शविली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याला केंद्राचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. मुंबईत रेल्वे विभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा वापरही करता येईल, अशी सूचना फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र राज्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली. फोर्स वन, एनएसजी हब, संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर, पोलीस दलाचे आधुनिकीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारच्या मुंबईतील जमिनींवर पुनर्विकासाची योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिली. (विशेष प्रतिनिधी) पोलीस दलासाठी केंद्र देणार निधी : महाराष्ट्रातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार भरीव मदत करेल, असे आश्वासन राजनाथसिंह यांनी दिले. मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याची कार्यवाही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.