शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे अंधेरी दफनभूमीचा पाणी शिंपडण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला

By admin | Updated: March 22, 2016 12:32 IST

कबरीवर पाणी शिंपडल्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याची दु:ख, वेदनांमधून सुटका होते असे मुस्लिम समाजामध्ये काहीजण मानतात.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - कबरीवर पाणी शिंपडल्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याची दु:ख, वेदना, नरकयातनांमधून सुटका होते असे मुस्लिम समाजामध्ये काहीजण मानतात. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक कबरीवर जाऊन पाणी शिंपडतात. मुंबईमध्ये सध्या काही भागांमध्ये पाणी टंचाई आहे. 
 
त्यामुळे अंधेरी चार बंगला येथील मुस्लिम कबरस्तान ट्रस्टच्या विश्वस्तांनी दफनभूमीमध्ये मोठा फलक लावून कबरीवर पाणी टाकण्याची प्रथा टाळण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. इस्लाममध्ये या प्रथेला आधार नसल्याचे त्यांनी फलकावर लिहीले आहे. मशिदीला लागून असलेल्या चारबंगला येथील या दफनभूमीमध्ये पंधराशे ते सोळाशे कबरी आहेत. प्रसिद्ध ऊर्दू कवी कैफी आझमी आणि अभिनेता फारुख शेख यांच्यावर याच दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले. 
 
दफनभूमीत प्रवेशव्दाराजवळ पाण्याचे डब्बे ठेवले आहेत. दफनभूमीत प्रवेश केल्यानंतर मृतांचे नातेवाईक डब्ब्यांमध्ये पाणी भरुन शिंपडण्यासाठी कबरीवर नेतात. पाणी टंचाईची कल्पना यावी यासाठी दफनभूमीत हा फलक लावला आहे. विश्वस्तांना महापालिकेने कोणतीही विनंती केलेली नाही. त्यांनी स्वेच्छेने पाणी टंचाईची जाणीव ठेऊन हा फलक लावला आहे. सध्या पाणी जपून वापरणे गरजेचे आहे असे विश्वस्तांनी सांगितले.