शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या भांडणात विरोधकांचा लाभ

By admin | Updated: May 17, 2016 03:26 IST

शिवसेना भाजपा युतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हाती लागले आहे़

मुंबई : शिवसेना भाजपा युतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हाती लागले आहे़ पालिकेवर नियंत्रण ठेवणारे वांद्रे येथील साहेब आणि त्यांचे पीए कोण, असे जाहीर करण्याचे आव्हान भाजपाला देत, काँग्रेसने आज स्थायी समिती दणाणून सोडली़, तर युतीमधील वादाचा फटका येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना बसणार आहे, असा आरोप मनसेने केला आहे़पालिकेच्या प्रत्येक विभागात घोटाळा असून, वांद्रे येथील साहेब आणि त्यांच्या पीएचे कारभारावर नियंत्रण असल्याचा आरोप भाजपा नेत्याने केला आहे़ वांद्रे येथील साहेब व त्यांचा पीए कोण, असा उपरोधक सवाल विचारणारे फलक घेऊन काँगे्रसच्या सदस्यांनी पालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनाबाहेर आज निदर्शने केली़स्थायी समितीच्या बैठकीत यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची अनुमती विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी मागितली होती़ मात्र, शिवसेनेला अडचणीत आणणारा हा मुद्दा स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी चर्चेला येऊ दिला नाही़ त्यामुळे काँग्रेसने निदर्शने सुरूच ठेवली़ या गोंधळातच स्थायीचे कामकाज आटोपण्यात आले़ (प्रतिनिधी)शहर भागात नालेसफाई विलंबानेचेल्या बैठकीत रोखून धरलेला शहर भागातील नाल्यांच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला़ नाल्यांमधील गाळ कुठे टाकणार, हे नमूद नसल्याने प्रस्ताव रोखला होता़ मात्र, भिवंडी आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी गाळ टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाने आज स्पष्ट केले़ भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतरच हा प्रस्ताव थांबवून ठेवण्यात आला होता, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे़मेट्रोला विरोध नाही़़़विस्थापितांचे कायविकास नियंत्रण नियमावलीत मेट्रो व मोनोसारख्या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार पालिकेकडून काढून घेण्यात आला आहे़ याचा तीव्र विरोध शिवसेनेने केला होता़ मात्र, हा विरोध मेट्रो प्रकल्पाला नसून, यामुळे विस्थापित होणाऱ्या मराठी माणसासाठी असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली़धारावीतील नालेसफाईचेकाम रेंगाळले - मनसेगेल्या बैठकीत भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने नालेसफाईचा प्रस्ताव रोखून धरला़ यामुळे माहीम धारावी विभागातील नाल्यांच्या सफाईचे काम रेंगाळले आहे़ हा विभाग येत्या पावसाळ्यात जलमय झाल्यास, शिवसेना भाजपा त्यास जबाबदार असतील, असे जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष मनसेचे सुधीर जाधव म्हणाले.