शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: June 24, 2016 01:47 IST

संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आळंदी नगर परिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी हाती घेण्यात आलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. शहरात विभागवार चोवीस तास पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. इंद्रायणी घाटासह शहरातील प्रमख वर्दळीच्या रस्त्यांवर सुमारे ७५ लाख रुपये निधीतून एलईडी दिवे नव्याने बसविण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून शनिवारपासून अवजड वाहनांना आळंदीतून प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात प्रमुख मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. ते परिसराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून असणार आहेत. बंदोबस्तासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेतच शंभराच्यावर पोलीस नेमण्यात आले असून, ते शनिवारपासून आळंदीत बंदोबस्त पाहणार आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, वीस पोलीस निरीक्षक, साठ पोलीस उपनिरीक्षक, पाचशे पोलीस जवान व महिला, चारशे होमगार्ड, गुन्हे शाखेचे दोन अधिकारी व वीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. वारीकाळात ‘स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, थर्माकोल पत्रावळी, प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक शहरातील व्यापऱ्यांकडील प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या पत्रावळी जप्त करणार आहे. भाविक-वारकऱ्यांनी कागदी पत्रावळीचा वापर करावा, शहरात उघड्यावर कचरा न टाकता पालिकेच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी पालिकेने जादा कर्मचारी नेमले आहेत. रात्रीच्या वेळी गर्दी नसेल तेव्हा रस्त्यावरील कचरा उचलला जाणार आहे. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरात विविध चौदा ठिकाणी सुमारे साडेपाचशे शौचालये उभी केली आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यंदा तात्पुरती, फायबरची पाचशे शौचालये उभारण्यात येत आहेत. शौचालयांच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्था काम करणार आहेत. वारीकाळात शौचालये मोफत ठेवली जाणार आहेत. वारीकाळात येत्या २५ तारखेपासून पिंपरी महापालिकेचे पिण्याचे पाणी देहूफाटा, काळेवाडी परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येईल. (वार्ताहर)