शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ विमानतळाचा विकास योजनेत समावेश करा

By admin | Updated: August 25, 2016 05:26 IST

यवतमाळचेच विमानतळ या योजनेतून बाहेर कसे, असा सवाल लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला

यवतमाळ : राज्यातील विविध विमानतळांचा विकास केला जात असताना यवतमाळचेच विमानतळ या योजनेतून बाहेर कसे, असा सवाल लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. विमानतळ विकासाच्या या योजनेत यवतमाळला तातडीने समाविष्ट करावे, अशी आग्रही मागणी देखील दर्डा यांनी केली आहे. राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणानुसार देशातील विविध शहरांना विमानसेवेने जोडण्यासाठी केंद्र शासनाने योजना आखली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नाशिक, जळगाव, शिर्डी, अमरावती, गोंदिया, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा शहरांतील विमानतळांचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.या योजनेतून विमानतळांचा आवश्यक पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक मदतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामंजस्य करारही करण्यात येणार आहे. या करारांतर्गत राज्य सरकारकडून विविध सवलती उपलब्ध करून दिल्या जातील. परंतु विमानतळ विकासाच्या या योजनेतून यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाला वगळल्याने विजय दर्डा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वाधिक आणि दर्जेदार कापूस पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. यवतमाळचे विमानतळही सर्वात जुने आहे. मात्र विकासाबाबत हेच विमानतळ राज्यात मागे पडले आहे. शासनाने या विमानतळाच्या विकासाबाबत रिलायन्ससोबत करार केला आहे. परंतु गेल्या काही वर्षांत रिलायन्सने अपेक्षित विकास केला नाही. त्यामुळे शासनाने यवतमाळचे हे विमानतळ रिलायन्सकडून ताब्यात घ्यावे, त्यांचा करार रद्द करावा आणि केंद्र शासनाच्या विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील विमानतळांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत दर्डा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा व बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांच्याशीही चर्चा केली. या मुद्यावर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दबाव गट निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)>करार रद्द करण्यासाठी प्रयत्न - संजय राठोडयवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाबाबत रिलायन्ससोबत केलेला करार तातडीने रद्द करून सरकारने हे विमानतळ विकासासाठी ताब्यात घ्यावे, अशी आपली सुरुवातीपासून भूमिका असल्याचे महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राठोड म्हणाले, रिलायन्सने विमानतळाचा विकास केला नाही. त्यामुळेच त्यांच्याशी झालेला करार रद्द करण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. मुनगंटीवार यांनी संबंधितांना तशा सूचनाही दिल्या होत्या. या विमानतळाचा विकास व्हावा, धावपट्टीची लांबी वाढावी आणि येथे नाईट लँडिंग व्हावे, यासाठी आपले प्रयत्न आहेत. २९ पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांशी भेटून हा विषय आपण मार्गी लावू, असे राठोड यांनी सांगितले.