शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

By admin | Updated: August 23, 2016 03:22 IST

सुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासंबंधी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे.

वसई : सुप्रीम कोर्टाने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनासंबंधी दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी वसईतील दहीहंडी पथकांना दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पोलिसांपुढील आव्हाने वाढली आहेत. या निर्णयानंतर वसईतील सर्व पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीत दहीहंडी पथकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांनी दिला आहे. कोर्टाने दहीहंडी उत्सवात १८ वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेण्यास पूर्ण बंदी घातली आहे. तसेच वीस फूटांपर्यंत अर्थात चार थरांनाच परवानगी दिली आहे. या आदेशाविरोधात पडसाद उमटू लागले आहेत. वसई विरार शहरातील अनेक मंडळांनी चार थरांपेक्षा जास्त थर लावण्याचा निर्धार केला आहे. काही राजकीय पक्षांनीही या निर्णयाला आव्हान देत दहीहंडी उत्सव जोरात करणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे पोलिसांपुढील जबाबादारी वाढली असल्याने वसईतल्या सर्वच्या सर्व म्हणजे सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहीहंडी आयोजकांच्या बैठका घेण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा असे आवाहन करतांना त्याचे उल्लघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवात तरुणांचा सहभाग अधिक असल्याने अनेकदा त्यांच्याकडून गोंधळ घातला जातो. गोविंदा पथक शहरात फिरतांना धुडगूस घालतात, तसेच इतर रहिवाशांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खास पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत. साध्या वेषातील पोलिसांचीही गस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती डीवायएसपी अनिल आकडे यांनी दिली. (प्रतिनिधी)