शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

रंग मिसळल्यास गूळ उत्पादकांवर कारवाई

By admin | Updated: May 23, 2015 00:23 IST

मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कोल्हापूर : गूळ चांगला दिसण्यासाठी त्यात विषारी रंग मिसळू नये, याकरिता शेतकरी, उत्पादकांत जागृती करणार आहे. तरीही असे रंग मिसळून भेसळ केल्यास गूळ उत्पादकांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी दिला. भेसळ रोखण्यासाठी केवळ दंडच नव्हे, तर सश्रम कारावासाची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात बदल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ संबंधी गूळ उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांची कार्यशाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्ह्यांचे पुढे काय करायचे, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. जाणीवपूर्वक कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही. गुळातील भेसळ कधीतरी रोखावीच लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्ती करताना उत्पादक, शेतकरी, व्यापारी या सर्वांना विश्वासात घेणार आहे. आगामी काळात सर्व गुऱ्हाळचालकांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा गूळ मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळायला हवेत, यावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक बाजारपेठेतही गुळाला चांगली मागणी आहे. औषध बनविण्यासाठीही गुळाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यास नवीन तंत्रज्ञान दिले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, गुऱ्हाळचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. सर्व अडचणी सोडवून शासनाने गूळ उत्पादकांना तरी ‘अच्छे दिन’ येण्यासाठी मदत करावी.राज्य गूळ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शहा म्हणाले, सध्याच्या कायद्यातील जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. जबर दंड केला जात आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. वालचंद संचेती, शरद शहा यांचे भाषण झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, उदय वंजारी, सुरेश देशमुख यांच्यासह उत्पादक व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)केवळ मुलगी सुंदर असून...विवाहावेळी केवळ मुलगी सुंदर बघून चालत नाही. ती घरच्यांना सांभाळते की नाही, याचाही विचार केला जातो. परदेशातील कोणती तरी मुलगी आणून तिला बायको म्हटल,े तर घरादाराची वाट लागते. तसेच केवळ गूळ चांगला दिसून उपयोग नाही, तो खायलाही पोषक असायला हवा, असे मंत्री बापट यांनी सांगताच एकच हशा पिकला.