शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

रंग मिसळल्यास गूळ उत्पादकांवर कारवाई

By admin | Updated: May 23, 2015 00:23 IST

मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कोल्हापूर : गूळ चांगला दिसण्यासाठी त्यात विषारी रंग मिसळू नये, याकरिता शेतकरी, उत्पादकांत जागृती करणार आहे. तरीही असे रंग मिसळून भेसळ केल्यास गूळ उत्पादकांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी दिला. भेसळ रोखण्यासाठी केवळ दंडच नव्हे, तर सश्रम कारावासाची शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात बदल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ संबंधी गूळ उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांची कार्यशाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते. आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते. मंत्री बापट म्हणाले, रंग मिसळलेला गूळ खाल्ल्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे गुळाचे नमुने घेऊन काही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्ह्यांचे पुढे काय करायचे, यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. जाणीवपूर्वक कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही. गुळातील भेसळ कधीतरी रोखावीच लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्ती करताना उत्पादक, शेतकरी, व्यापारी या सर्वांना विश्वासात घेणार आहे. आगामी काळात सर्व गुऱ्हाळचालकांची नोंदणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा गूळ मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळायला हवेत, यावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक बाजारपेठेतही गुळाला चांगली मागणी आहे. औषध बनविण्यासाठीही गुळाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यास नवीन तंत्रज्ञान दिले जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, गुऱ्हाळचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. सर्व अडचणी सोडवून शासनाने गूळ उत्पादकांना तरी ‘अच्छे दिन’ येण्यासाठी मदत करावी.राज्य गूळ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शहा म्हणाले, सध्याच्या कायद्यातील जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. जबर दंड केला जात आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. वालचंद संचेती, शरद शहा यांचे भाषण झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, उदय वंजारी, सुरेश देशमुख यांच्यासह उत्पादक व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)केवळ मुलगी सुंदर असून...विवाहावेळी केवळ मुलगी सुंदर बघून चालत नाही. ती घरच्यांना सांभाळते की नाही, याचाही विचार केला जातो. परदेशातील कोणती तरी मुलगी आणून तिला बायको म्हटल,े तर घरादाराची वाट लागते. तसेच केवळ गूळ चांगला दिसून उपयोग नाही, तो खायलाही पोषक असायला हवा, असे मंत्री बापट यांनी सांगताच एकच हशा पिकला.