शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणच्या ६३ अभियंत्यांवर कारवाई

By admin | Updated: May 24, 2016 04:37 IST

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना बडतर्फ करण्यात आले असून ५१ अभियंत्यांची पदावनती (डिमोशन) केले गेले आहे. या अभियंत्यांवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ‘व्हिजीलन्स’ने ठेवला आहे. वीज पारेषण कंपनीमध्ये ८ जानेवारी २०१४ ला तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर जागांकरिता सरळसेवा भरती घेण्यात आली. कार्यकारी अभियंता पदाकरिता शैक्षणिक पात्रतेसोबतच नऊ वर्षांचा अनुभव तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता (उपकार्यकारी) पदाकरिता सात वर्षांचा अनुभव आवश्यक होता. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या सर्वाधिक ५८ जागा होत्या. २६ फेब्रुवारी २०१४ ला या पदांची आॅनलाइन परीक्षा तर नोव्हेंबर २०१४ ला मुलाखती पार पडल्या आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सुमारे वर्षभर त्यांनी सेवा दिली. यात काही उमेदवार बाहेरून थेट भरतीद्वारे निवडले गेले तर काही वीज कंपन्यांमध्ये आधीच सेवेत असलेले अभियंते वरिष्ठ पदावर पात्र ठरले.यातील बहुतांश उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार महापारेषणला प्राप्त झाली. त्यानंतर दक्षता (व्हिजीलन्स) विभागामार्फत केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले. अनेक उमेदवारांनी बड्या इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडील कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र व्हिजीलन्सच्या चौकशीत सदर कंत्राटदाराने या उमेदवाराला किती वेतन दिले, पीएफ कापला का, प्राप्तिकर भरला का याची उत्तरे मिळू शकली नाहीत. अखेर ६३ अभियंत्यांनी बोगस अनुभव प्रमाणपत्रे सादर केल्याचा ठपका व्हिजीलन्सने ठेवला. व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाने या ६३ अभियंत्यांवर २० मे रोजी कारवाई केली. त्यात १२ अभियंत्यांना बडतर्फ, एक कार्यकारी व ५० अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे डिमोशन करण्यात आले. वर्षभर आर्थिक लाभ घेणाऱ्या या अभियंत्यांवर शिक्षा म्हणून आणखी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना महापारेषणने बडतर्फ व डिमोशनची कारवाई केलेल्या अभियंत्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत मागितले नव्हते. आॅनलाइन परीक्षेच्या वेळी त्याची मागणी झाली नाही, अचानक २९ मे २०१४ ला अधिसूचना काढून प्रमाणपत्र मागण्यात आले. दक्षता विभागाने उमेदवारांना विश्वासात न घेता थेट अनुभव घेतलेल्या कंत्राटदार-कंपन्यांकडे पत्रव्यवहार केले. आम्ही सादर केलेल्या उत्तरांचा विचार झाला नाही. नेमक्या कोणत्या कारणावरून आमची प्रमाणपत्रे बोगस वाटली हे दक्षता विभागाने स्पष्ट केले नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दक्षता पथकामार्फत उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री