शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणच्या ६३ अभियंत्यांवर कारवाई

By admin | Updated: May 24, 2016 04:37 IST

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीत सरळसेवा भरतीत झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून तब्बल ६३ अभियंत्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली आहे. १२ जणांना बडतर्फ करण्यात आले असून ५१ अभियंत्यांची पदावनती (डिमोशन) केले गेले आहे. या अभियंत्यांवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ‘व्हिजीलन्स’ने ठेवला आहे. वीज पारेषण कंपनीमध्ये ८ जानेवारी २०१४ ला तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर जागांकरिता सरळसेवा भरती घेण्यात आली. कार्यकारी अभियंता पदाकरिता शैक्षणिक पात्रतेसोबतच नऊ वर्षांचा अनुभव तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता (उपकार्यकारी) पदाकरिता सात वर्षांचा अनुभव आवश्यक होता. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या सर्वाधिक ५८ जागा होत्या. २६ फेब्रुवारी २०१४ ला या पदांची आॅनलाइन परीक्षा तर नोव्हेंबर २०१४ ला मुलाखती पार पडल्या आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. सुमारे वर्षभर त्यांनी सेवा दिली. यात काही उमेदवार बाहेरून थेट भरतीद्वारे निवडले गेले तर काही वीज कंपन्यांमध्ये आधीच सेवेत असलेले अभियंते वरिष्ठ पदावर पात्र ठरले.यातील बहुतांश उमेदवारांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार महापारेषणला प्राप्त झाली. त्यानंतर दक्षता (व्हिजीलन्स) विभागामार्फत केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले. अनेक उमेदवारांनी बड्या इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडील कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र व्हिजीलन्सच्या चौकशीत सदर कंत्राटदाराने या उमेदवाराला किती वेतन दिले, पीएफ कापला का, प्राप्तिकर भरला का याची उत्तरे मिळू शकली नाहीत. अखेर ६३ अभियंत्यांनी बोगस अनुभव प्रमाणपत्रे सादर केल्याचा ठपका व्हिजीलन्सने ठेवला. व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाने या ६३ अभियंत्यांवर २० मे रोजी कारवाई केली. त्यात १२ अभियंत्यांना बडतर्फ, एक कार्यकारी व ५० अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे डिमोशन करण्यात आले. वर्षभर आर्थिक लाभ घेणाऱ्या या अभियंत्यांवर शिक्षा म्हणून आणखी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांमध्ये अन्यायाची भावना महापारेषणने बडतर्फ व डिमोशनची कारवाई केलेल्या अभियंत्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत मागितले नव्हते. आॅनलाइन परीक्षेच्या वेळी त्याची मागणी झाली नाही, अचानक २९ मे २०१४ ला अधिसूचना काढून प्रमाणपत्र मागण्यात आले. दक्षता विभागाने उमेदवारांना विश्वासात न घेता थेट अनुभव घेतलेल्या कंत्राटदार-कंपन्यांकडे पत्रव्यवहार केले. आम्ही सादर केलेल्या उत्तरांचा विचार झाला नाही. नेमक्या कोणत्या कारणावरून आमची प्रमाणपत्रे बोगस वाटली हे दक्षता विभागाने स्पष्ट केले नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दक्षता पथकामार्फत उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याबाबतचा अहवाल व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री