शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन

By admin | Updated: September 27, 2016 01:25 IST

आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती.

मुंबई : आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती. त्यांचे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. ते जैन धर्माच्या तपगच्छ शाखेचे प्रमुख होते. त्यांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आहे. जैन धर्मात महान संताच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे सदस्यांसाठी सन्मानाचे समजले जाते. अंतिम संस्कारासाठी लावण्यात आलेल्या बोलीच्या रकमेतून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग धार्मिक आणि प्राणिमात्रांच्या हितासाठी करण्यात येतो. आचार्य प्रेमसूरीश्वरजी यांच्या अंत्यविधीसाठीची बोली वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात झाली. ही प्रक्रिया तीन तास चालली. एक प्रसिद्ध डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन प्रसिद्ध व्यावसायिकांनी जैनाचार्य यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. खांदा देण्यासाठी प्रत्येकी २१ लाख रुपयांची बोली चार सदस्यांनी लावली. पालखीच्या चारही बाजूंना पाण्याने भरलेले पात्र ठेवण्यासाठी २१ लाखांची बोली लावण्यात आली होती. ११.११ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या जैन समाजातील पाचही सदस्यांनी मिळून काल दुपारी ४.३० वाजता जैन मुनींच्या पार्थिवाला अग्नी दिला. जैन समाजाचे एक सदस्य गिरीश जैन यांच्यामते ज्या स्थळावर जैनाचार्यचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे बोलीतून मिळालेल्या रकमेतून भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार ह्युजेस रोडवरील पंचशिल प्लाझा बिल्डिंगच्या मागील मैदानावर करण्यात आले. त्यांना पूर्वी ब्रीच कॅन्डी रुग्णालय आणि शनिवारी रात्री सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तपगच्छाधिपती प्रेमसूरीश्वरजी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जगभरात १० लाख संदेश पाठविण्यात आले. (प्रतिनिधी) रवींद्रसूरीजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटींची बोली जुलै महिन्यात जैनाचार्य श्रीमद्विजय रवींद्रसूरीजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटी रुपयांची सामुहिक बोली लावली होती. रवींद्रसूरीजी महाराज यांचे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या २५ विधीसाठी वेगवेगळी बोली लावण्यात आली होती. खांदा देण्यासाठी ४ सदस्यांनी १.५७ कोटी रुपयांची बोली लावली होती. महाराजांचे पार्थिव चितेवर ठेवण्यासाठी ४१.४१ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.