शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन

By admin | Updated: September 27, 2016 01:25 IST

आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती.

मुंबई : आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती. त्यांचे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. ते जैन धर्माच्या तपगच्छ शाखेचे प्रमुख होते. त्यांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आहे. जैन धर्मात महान संताच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे सदस्यांसाठी सन्मानाचे समजले जाते. अंतिम संस्कारासाठी लावण्यात आलेल्या बोलीच्या रकमेतून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग धार्मिक आणि प्राणिमात्रांच्या हितासाठी करण्यात येतो. आचार्य प्रेमसूरीश्वरजी यांच्या अंत्यविधीसाठीची बोली वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात झाली. ही प्रक्रिया तीन तास चालली. एक प्रसिद्ध डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन प्रसिद्ध व्यावसायिकांनी जैनाचार्य यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. खांदा देण्यासाठी प्रत्येकी २१ लाख रुपयांची बोली चार सदस्यांनी लावली. पालखीच्या चारही बाजूंना पाण्याने भरलेले पात्र ठेवण्यासाठी २१ लाखांची बोली लावण्यात आली होती. ११.११ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या जैन समाजातील पाचही सदस्यांनी मिळून काल दुपारी ४.३० वाजता जैन मुनींच्या पार्थिवाला अग्नी दिला. जैन समाजाचे एक सदस्य गिरीश जैन यांच्यामते ज्या स्थळावर जैनाचार्यचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे बोलीतून मिळालेल्या रकमेतून भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार ह्युजेस रोडवरील पंचशिल प्लाझा बिल्डिंगच्या मागील मैदानावर करण्यात आले. त्यांना पूर्वी ब्रीच कॅन्डी रुग्णालय आणि शनिवारी रात्री सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तपगच्छाधिपती प्रेमसूरीश्वरजी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जगभरात १० लाख संदेश पाठविण्यात आले. (प्रतिनिधी) रवींद्रसूरीजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटींची बोली जुलै महिन्यात जैनाचार्य श्रीमद्विजय रवींद्रसूरीजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटी रुपयांची सामुहिक बोली लावली होती. रवींद्रसूरीजी महाराज यांचे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या २५ विधीसाठी वेगवेगळी बोली लावण्यात आली होती. खांदा देण्यासाठी ४ सदस्यांनी १.५७ कोटी रुपयांची बोली लावली होती. महाराजांचे पार्थिव चितेवर ठेवण्यासाठी ४१.४१ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.