शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन

By admin | Updated: September 27, 2016 01:25 IST

आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती.

मुंबई : आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती. त्यांचे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. ते जैन धर्माच्या तपगच्छ शाखेचे प्रमुख होते. त्यांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आहे. जैन धर्मात महान संताच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे सदस्यांसाठी सन्मानाचे समजले जाते. अंतिम संस्कारासाठी लावण्यात आलेल्या बोलीच्या रकमेतून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग धार्मिक आणि प्राणिमात्रांच्या हितासाठी करण्यात येतो. आचार्य प्रेमसूरीश्वरजी यांच्या अंत्यविधीसाठीची बोली वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात झाली. ही प्रक्रिया तीन तास चालली. एक प्रसिद्ध डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन प्रसिद्ध व्यावसायिकांनी जैनाचार्य यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. खांदा देण्यासाठी प्रत्येकी २१ लाख रुपयांची बोली चार सदस्यांनी लावली. पालखीच्या चारही बाजूंना पाण्याने भरलेले पात्र ठेवण्यासाठी २१ लाखांची बोली लावण्यात आली होती. ११.११ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या जैन समाजातील पाचही सदस्यांनी मिळून काल दुपारी ४.३० वाजता जैन मुनींच्या पार्थिवाला अग्नी दिला. जैन समाजाचे एक सदस्य गिरीश जैन यांच्यामते ज्या स्थळावर जैनाचार्यचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे बोलीतून मिळालेल्या रकमेतून भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार ह्युजेस रोडवरील पंचशिल प्लाझा बिल्डिंगच्या मागील मैदानावर करण्यात आले. त्यांना पूर्वी ब्रीच कॅन्डी रुग्णालय आणि शनिवारी रात्री सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तपगच्छाधिपती प्रेमसूरीश्वरजी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जगभरात १० लाख संदेश पाठविण्यात आले. (प्रतिनिधी) रवींद्रसूरीजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटींची बोली जुलै महिन्यात जैनाचार्य श्रीमद्विजय रवींद्रसूरीजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटी रुपयांची सामुहिक बोली लावली होती. रवींद्रसूरीजी महाराज यांचे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या २५ विधीसाठी वेगवेगळी बोली लावण्यात आली होती. खांदा देण्यासाठी ४ सदस्यांनी १.५७ कोटी रुपयांची बोली लावली होती. महाराजांचे पार्थिव चितेवर ठेवण्यासाठी ४१.४१ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.