शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

रस्ताबांधणीचे सुमारे ४० कोटी पाण्यात

By admin | Updated: July 21, 2014 03:26 IST

शहरातील रस्त्याची पुनर्बांधणी व दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च करूनही पावसाळयात त्यांची चाळण झाली आहे.

उल्हासनगर : शहरातील रस्त्याची पुनर्बांधणी व दुरुस्तीवर कोट्यवधी खर्च करूनही पावसाळयात त्यांची चाळण झाली आहे. महापालिका हद्दीतील बहुंताश रस्त्याची दुरस्ती व पुनर्बांधणी लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेला केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन पावसाळयात रत्यांची चाळणी होऊन रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त करून मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते हिराघाट रस्ता, भंगार गल्ली रस्ता, राधास्वामी संत्सग ते सेक्शन रस्ता, भाटिया चौक ते कालिका मंदिर रस्ता, फॉरवर्ड लाइन ते टॉऊन हॉल रस्ता, गणेश नगर रस्ता, टँकर पाणी पॉइंट रस्ता, व्हिनस चौक ते मार्यानगरी रस्ता आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत़ पालिकेचे क्षेत्रफळ जेमतेम १३ किमी असून शहरातील रस्ता बांधणी व दुरुस्तीवर खासदार निधी, आमदार निधी, महापौर व स्थायी समिती सभापती निधी, नगरसेवक निधी खर्च होत आहे. आदीच्या निधीच्या खर्चानंतरही महापालिका दरवर्षी रस्ता बांधणीवर ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करीत आहे. दरवर्षी कोट्यवधीचा निधी फक्त रस्त्याच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीवर खर्च होऊनही त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील गाऊन मार्केटमधील रस्ता, हिराघाट रस्ता, नेताजी चौक ते व्हिनस चौक रस्ता, काली माता चौक ते गणेश नगर रस्ता एका वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत. एका वर्षात या काँक्रिट रस्त्याची स्थिती डांबरी रस्त्यासारखी झाली आहे. पालिका अशा ठेकेदारावर काहीएक कारवाई करीत नसल्याने पालिकेवर टीका होत आहे. (प्रतिनिधी)