शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून ८७ कोटींची कामे

By admin | Updated: October 16, 2016 02:20 IST

गेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच

- व्यंकटेश वैष्णव,  बीडगेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाही धावून आल्या. सिंचनाची मोठी कामे हाती घेण्यात आली. मागील दीड वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून जिल्ह्यात ८७ कोटींची कामे झालेली आहेत. गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाझर तलाव, लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्याला आता दोन वर्षे पाण्याची चिंता नाही.सुरुवातीला बिंदूसरा प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पुढाकार घेत सर्व सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने या मोहिमेला बळ दिले. यानंतर नाम फाउंडेशन, जैन संघटना, मानवलोक यासह विविध संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. गावातील नागरिकदेखील गाळ काढण्याच्या कामासाठी एकवटले. यातून पाझर तलाव, लघु प्रकल्प व मध्यम प्रकल्पातील १२५ लाख घनमीटर गाळ काढला. यासाठी शासनाने निविदा काढल्या असत्या तर अंदाजित ६२.५० कोटी रुपयांचा खर्च झाला असता. ६८ कामे लोकसहभागातून झाली आहेत. नदी रुंदीकरण खोलीकरण काम पूर्णबीड तालुक्यातील लोळदगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहयोगातून नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे मोठे काम पूर्ण झाले आहे. बिंदूसरा नदी पात्रावर हे काम असल्याने सद्य:स्थितीत मोठा जलसाठा झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम मानवलोकच्या माध्यमातून झाले. अभिनेता आमीर खान याने पुढाकार घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील वॉटर कप स्पर्धा घेऊन राडीतांडा व खापरटोन येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे केली.बीडसारख्या ठिकाणी लोकसहभागातून कामे होत नसतात, असे म्हटले जात होते. मात्र झालेली सिंचनाची कामे पाहता कार्य संस्कृती बदलाचे प्रतीक म्हणून या कामांकडे पाहावे लागेल. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी बीड