शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

लोकसहभागातून ८७ कोटींची कामे

By admin | Updated: October 16, 2016 02:20 IST

गेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच

- व्यंकटेश वैष्णव,  बीडगेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थाही धावून आल्या. सिंचनाची मोठी कामे हाती घेण्यात आली. मागील दीड वर्षात दुष्काळी परिस्थिती असताना विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून जिल्ह्यात ८७ कोटींची कामे झालेली आहेत. गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाझर तलाव, लघु प्रकल्प तुडुंब भरले आहेत. जिल्ह्याला आता दोन वर्षे पाण्याची चिंता नाही.सुरुवातीला बिंदूसरा प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पुढाकार घेत सर्व सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने या मोहिमेला बळ दिले. यानंतर नाम फाउंडेशन, जैन संघटना, मानवलोक यासह विविध संघटनांनी आपला सहभाग नोंदविला. गावातील नागरिकदेखील गाळ काढण्याच्या कामासाठी एकवटले. यातून पाझर तलाव, लघु प्रकल्प व मध्यम प्रकल्पातील १२५ लाख घनमीटर गाळ काढला. यासाठी शासनाने निविदा काढल्या असत्या तर अंदाजित ६२.५० कोटी रुपयांचा खर्च झाला असता. ६८ कामे लोकसहभागातून झाली आहेत. नदी रुंदीकरण खोलीकरण काम पूर्णबीड तालुक्यातील लोळदगाव येथे नाम फाउंडेशनच्या सहयोगातून नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे मोठे काम पूर्ण झाले आहे. बिंदूसरा नदी पात्रावर हे काम असल्याने सद्य:स्थितीत मोठा जलसाठा झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम मानवलोकच्या माध्यमातून झाले. अभिनेता आमीर खान याने पुढाकार घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील वॉटर कप स्पर्धा घेऊन राडीतांडा व खापरटोन येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे केली.बीडसारख्या ठिकाणी लोकसहभागातून कामे होत नसतात, असे म्हटले जात होते. मात्र झालेली सिंचनाची कामे पाहता कार्य संस्कृती बदलाचे प्रतीक म्हणून या कामांकडे पाहावे लागेल. - नवल किशोर राम, जिल्हाधिकारी बीड