शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील ८१६ सिंचन विहिरी रद्द

By admin | Updated: June 30, 2016 00:11 IST

उपमुकाअ यांनी दिलेल्या अहवालात निधीचे नियमबाहय़ पद्धतीने वाटप झाल्याचा ठपका.

राजेश शेगोकार/ अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सिंचनासाठी विहिरी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना दिलेले निकष पूर्ण केले नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यात मंजूर केलेल्या ८१६ सिंचन विहिरी रद्द करण्याची शिफारस पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी अहवालात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण तालुक्यातील विहिरी रद्द होण्याचा हा विदर्भातील पहिलाच प्रकार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून सिंचन विहिरी दिल्या जात आहेत. तीन लाख रुपये एका विहिरीसाठी अनुदान मिळत असल्याने शेतकर्‍यांसाठी ही योजना संजीवनी देणारी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थींची निवड करताना शासनाने लाभार्थींचा प्राधान्यक्रम दिला आहे. प्रत्येक गावासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार विहिरींचा लक्ष्यांक दिला आहे. या लक्ष्यांकानुसारच विहिरींचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा आहे. मूर्तिजापूर तालुक्यात ८१६ सिंचन विहिरी मंजूर करताना यामधील एकही निकष पाळल्या गेलेला नाही. ग्रामसभेने सिंचन विहिरी मंजूर करण्यासाठी निवडलेल्या लाभार्थींच्या यादीमध्ये असलेला प्राधान्यक्रमही तत्कालिन गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी बदलवून टाकला आहे. तालुक्याला दिलेले लक्ष्यांक पूर्ण करताना येथील अधिकार्‍यांनी गावनिहाय लक्ष्यांकाचे भान ठेवलेले नसल्याने सिंचन विहीर देण्यामागचा शासनाचा उद्देशच धोक्यात आला आहे.