शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

ओला, उबरबाबत ८0 टक्के प्रवासी समाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:58 IST

टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे.

मुंबई : ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने मुंबईसह देशभरातील निवडक शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ८0 टक्के प्रवाशांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांबाबत समाधान व्यक्त केल्याचे समोर आले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार हे त्रासदायक असल्याचे ९४ टक्के लोकांनी सांगितले आहे. ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना विरोध करत रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात येते. त्यासाठी प्रवाशांनाही वेठीस धरले जाते. यावर तोडगा काढण्याची मागणी युनियनकडून केली जाताच केंद्राकडून नियमावली करण्यात येत असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली होती. ओला, उबरविरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षांचा होणारा संघर्ष पाहता ग्राहकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीनेच पुढाकार घेत आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आदी शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७६ हजार १६९ नागरिकांनी भाग घेतला. रोज ओला, उबरची सेवा वापरणारे ८,४६३ म्हणजेच ११ टक्के लोक होते. तर २१ टक्के लोक क्वचितच या सेवेचा वापर करतात. ३९ टक्के आठवड्यातून अनेकदा या सेवा वापरतात. ४७ टक्के लोकांच्या मते रिक्षा-टॅक्सी व मेरु-टॅब यांच्या तुलनेत ओला-उबरचे दर कमी आहेत. ओला-उबर आदी कंपन्यांच्या चालकांचे वर्तन चांगले असल्याचा अनुभव ५१ हजारांहून अधिक ग्राहकांना आला आहे. १४ हजार ७२४ ग्राहकांनी या कंपन्यांच्या चालकांचे वर्तन आवडले नसल्याचे मत नोंदविले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वर्तनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २८ हजार ५२९ ग्राहकांनी टॅक्सी चालकांचे तर ३५ हजार ९७0 ग्राहकांनी रिक्षा चालकांचे वर्तन वाईट असल्याचे सांगितले आहे. ६,७२४ ग्राहकांनी रिक्षाचालक आणि ६,२0९ ग्राहकांनी टॅक्सीचालकांची वर्तवणूक उत्तम असल्याचे मत नोंदविले आहे. (प्रतिनिधी)>भाडे नाकारण्याने त्रस्तरिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याने प्रवासी त्रास्त आहेत. ७१ हजार ७२६ म्हणजेच ९४ टक्के लोकांनी अशी तक्रार केली. तर ६ टक्के लोकांनी त्रस्त नसल्याचे मत नोंदविले.