शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबरबाबत ८0 टक्के प्रवासी समाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:58 IST

टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे.

मुंबई : ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने मुंबईसह देशभरातील निवडक शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ८0 टक्के प्रवाशांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांबाबत समाधान व्यक्त केल्याचे समोर आले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार हे त्रासदायक असल्याचे ९४ टक्के लोकांनी सांगितले आहे. ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना विरोध करत रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात येते. त्यासाठी प्रवाशांनाही वेठीस धरले जाते. यावर तोडगा काढण्याची मागणी युनियनकडून केली जाताच केंद्राकडून नियमावली करण्यात येत असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली होती. ओला, उबरविरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षांचा होणारा संघर्ष पाहता ग्राहकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीनेच पुढाकार घेत आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आदी शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७६ हजार १६९ नागरिकांनी भाग घेतला. रोज ओला, उबरची सेवा वापरणारे ८,४६३ म्हणजेच ११ टक्के लोक होते. तर २१ टक्के लोक क्वचितच या सेवेचा वापर करतात. ३९ टक्के आठवड्यातून अनेकदा या सेवा वापरतात. ४७ टक्के लोकांच्या मते रिक्षा-टॅक्सी व मेरु-टॅब यांच्या तुलनेत ओला-उबरचे दर कमी आहेत. ओला-उबर आदी कंपन्यांच्या चालकांचे वर्तन चांगले असल्याचा अनुभव ५१ हजारांहून अधिक ग्राहकांना आला आहे. १४ हजार ७२४ ग्राहकांनी या कंपन्यांच्या चालकांचे वर्तन आवडले नसल्याचे मत नोंदविले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वर्तनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २८ हजार ५२९ ग्राहकांनी टॅक्सी चालकांचे तर ३५ हजार ९७0 ग्राहकांनी रिक्षा चालकांचे वर्तन वाईट असल्याचे सांगितले आहे. ६,७२४ ग्राहकांनी रिक्षाचालक आणि ६,२0९ ग्राहकांनी टॅक्सीचालकांची वर्तवणूक उत्तम असल्याचे मत नोंदविले आहे. (प्रतिनिधी)>भाडे नाकारण्याने त्रस्तरिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याने प्रवासी त्रास्त आहेत. ७१ हजार ७२६ म्हणजेच ९४ टक्के लोकांनी अशी तक्रार केली. तर ६ टक्के लोकांनी त्रस्त नसल्याचे मत नोंदविले.