शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

ओला, उबरबाबत ८0 टक्के प्रवासी समाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:58 IST

टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे.

मुंबई : ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना रिक्षा-टॅक्सी युनियनकडून जरी विरोध करण्यात येत असला तरी या खासगी सेवांना ग्राहकांकडून पसंती देण्यात येत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने मुंबईसह देशभरातील निवडक शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ८0 टक्के प्रवाशांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांबाबत समाधान व्यक्त केल्याचे समोर आले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार हे त्रासदायक असल्याचे ९४ टक्के लोकांनी सांगितले आहे. ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्यांना विरोध करत रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात येते. त्यासाठी प्रवाशांनाही वेठीस धरले जाते. यावर तोडगा काढण्याची मागणी युनियनकडून केली जाताच केंद्राकडून नियमावली करण्यात येत असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली होती. ओला, उबरविरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षांचा होणारा संघर्ष पाहता ग्राहकांच्या भावना जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीनेच पुढाकार घेत आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आदी शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७६ हजार १६९ नागरिकांनी भाग घेतला. रोज ओला, उबरची सेवा वापरणारे ८,४६३ म्हणजेच ११ टक्के लोक होते. तर २१ टक्के लोक क्वचितच या सेवेचा वापर करतात. ३९ टक्के आठवड्यातून अनेकदा या सेवा वापरतात. ४७ टक्के लोकांच्या मते रिक्षा-टॅक्सी व मेरु-टॅब यांच्या तुलनेत ओला-उबरचे दर कमी आहेत. ओला-उबर आदी कंपन्यांच्या चालकांचे वर्तन चांगले असल्याचा अनुभव ५१ हजारांहून अधिक ग्राहकांना आला आहे. १४ हजार ७२४ ग्राहकांनी या कंपन्यांच्या चालकांचे वर्तन आवडले नसल्याचे मत नोंदविले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या वर्तनाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २८ हजार ५२९ ग्राहकांनी टॅक्सी चालकांचे तर ३५ हजार ९७0 ग्राहकांनी रिक्षा चालकांचे वर्तन वाईट असल्याचे सांगितले आहे. ६,७२४ ग्राहकांनी रिक्षाचालक आणि ६,२0९ ग्राहकांनी टॅक्सीचालकांची वर्तवणूक उत्तम असल्याचे मत नोंदविले आहे. (प्रतिनिधी)>भाडे नाकारण्याने त्रस्तरिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याने प्रवासी त्रास्त आहेत. ७१ हजार ७२६ म्हणजेच ९४ टक्के लोकांनी अशी तक्रार केली. तर ६ टक्के लोकांनी त्रस्त नसल्याचे मत नोंदविले.