शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

साताऱ्यातील ७०० ग्रामपंचायत सदस्य अडचणीत

By admin | Updated: August 26, 2016 04:54 IST

निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने सातशे ग्रामपंचायत सदस्य अडचणीत सापडले आहेत.

सातारा : निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने सातशे ग्रामपंचायत सदस्य अडचणीत सापडले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटिसा धाडण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर यापैकी काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोटीस धाडलेले सर्वच सदस्य अपात्र ठरल्यास या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी एका उमेदवाराला २० हजारांप्रमाणे खर्च येणार असून, याचा तब्बल २० लाखांचा बोजा शासनाच्या तिजोरीवरच पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या राहिलेल्या मागास समाजातील उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही त्यांच्याकडून प्रमाणपत्र सादर न झाल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी नोटीसा धाडल्या आाहेत. तर सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. वाई तालुक्यातील गुळुंबचे येथील दोन सदस्य अपात्रतेच्या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असा स्थगिती आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्त्या सदस्यांचे वकील अ‍ॅड. रवी डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)