शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत पूर्ण केला

By admin | Updated: February 12, 2017 20:43 IST

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

ऑनलाइन लोकमतनरसीफाटा (नांदेड), दि. 12 - केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. गत ७० वर्षांत झाली नाहीत इतकी कामे अडीच वर्षांत पूर्ण करत विकासाचा अनुशेष भरून काढल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नरसीफाटा येथे आयोजित जाहीर सभेत केले.नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ नरसीफाटा (ता. नायगाव) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. मंचावर माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आ. तुषार राठोड, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रावण पाटील भिलंवडे, बालाजी बच्चेवार, जिल्हा चिटणीस राजू गंदीगुडे, उमेदवार माणिकराव लोहगावे, मीनलताई खतगावकर, लक्ष्मण ठक्करवाड आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपा सरकार सत्तेत आले, तेव्हा राज्यात दुष्काळामुळे भयावह स्थिती होती. तिजोरीत एक रूपया नसताना आम्ही दुष्काळावर मात करत शेतकऱ्यांसाठी १७ हजार कोटी रुपयांच्या उपाययोजना केल्या. महाराष्ट्रातील २० हजार गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर होता. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेऊन ही योजना शेतकरी, शेतमजूर यांच्या मदतीने पूर्ण केली. यातून २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली़ यापूर्वीच्या सरकारने जलसिंचनावर राज्यात ७० हजार कोटी खर्च केले. मात्र यातून पाण्याचा एक थेंब अडवता आला नाही, असे म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्प मागील सरकार पूर्ण करू शकले नाही. पण मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जातील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना विजेसाठी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. यातून जून २०१७ नंतर शेतातील विद्युत पंपासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे. काँग्रेसने गोरगरिबांसाठी दहा वर्षांत जेवढी घरे उपलब्ध करून दिली. त्यापेक्षा जास्त घरे आम्ही सत्तेवर आल्यापासून उपलब्ध करून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ पर्यंत राज्यात एकही माणूस घराविना राहणार नाही. पूर्वी बँका श्रीमंतालाच कर्ज देत; पण आमच्या आदेशाने राज्यातील एक कोटी गरिबांना बँकेतून कर्ज मिळाले आहे.विकास निधी देताना स्थानिक पातळीवर सत्ता कुणाची, असा विचार कधीच केला नाही. जिल्हा परिषदेसाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. निधी वाटपात दुजाभाव केला नाही. याउलट यापूर्वीच्या सरकारने ७० वर्षांत काय केले याचा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.>मराठा आरक्षणावरून सभेत घोषणामुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना मराठा आरक्षणाचे काय झाले म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला़ त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहत बसा बसा, मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देणार आहोत, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली़ सभेत घोषणाबाजी करणाऱ्या गुलाबराव जाधव, दशरथ कपाटे, सतीश पाटील पवार, किरण पाटील दिघळीकर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.