शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६ टक्के बालकांचा अतिसाराने मृत्यू

By admin | Updated: July 29, 2016 01:48 IST

अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे : अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना होणाऱ्या जुलाबामुळे बालकांच्या शरीरातील पाण्याचे, तसेच क्षारांचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कमी होऊन प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो. यावर जलसंजीवनी हा अतिशय उत्तम उपाय असून, त्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन २९ जुलै या जागतिक जलसंजीवनी दिनाच्या निमित्ताने जगभरातून होताना दिसत आहे. अतिसार दीर्घकाळ राहिल्यास मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशक्तपणा येतो, तसेच वजन कमी होऊन कुपोषणाची समस्याही ओढवू शकते. जलसंजीवनीमध्ये ग्लुकोज, सोडिअम, पोटॅशियम व सायट्रेट हे महत्त्वाचे घटक असतात. जुलाबांमुळे शरीरातील हे क्षार बाहेर फेकले गेल्याने अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा आणि शुष्कता भरून काढण्यासाठी जलसंजीवनी अतिशय उपयुक्त ठरते. बालकाला देण्यात येणाऱ्या जलसंजीवनीतील घटकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या प्रमाणात असणे आवश्यक असते.१ लीटर पाण्यात एक पाकीट टाकावे व दर पाच मिनिटाला एक चमचा अशा प्रमाणात ही जलसंजीवनी देण्यात यावी. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे बालरोग संघटनेकडून सांगण्यात आले. ही संजीवनी देण्याचे योग्य ते प्रशिक्षण डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनीही अतिसार झालेल्या बालकाला औषधे देताना सर्वप्रथम जलसंजीवनी देणे आवश्यक आहे. ही जलसंजीवनी औषधांच्या दुकानांबरोबरच किराणा दुकान किंवा जनरल स्टोअरमध्येही उपलब्ध व्हावी, यासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना प्रयत्नशील असल्याचे डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. जलसंजीवनी हा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय असून, बाळाला ते जरूर देण्यात यावे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)- बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये अतिसार असलेल्या, तसेच नसलेल्या बालकांनाही जलसंजीवनी देण्यात आली. अतिसाराच्या बालकांची संख्या कमी करणे आणि यामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.