शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

मानखुर्द बालसुधारगृहात ६ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2016 05:49 IST

मानखुर्दच्या बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

समीर कर्णुक,  मुंबईमानखुर्दच्या बालसुधारगृहात गेल्या दीड महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब येथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवली असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.मुलांच्या मृत्यूच्या घटनेला मानखुर्द बालसुधारगृहाचे अधीक्षक राहुल कंठीकर यांनीही दुजोरा दिला आहे. समाजातील अनाथ, वंचित, गतिमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृहे आहेत. ‘द चिल्ड्रेन्स एड सोसायटी’ या बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेकडे या सगळ्या सुधारगृहांचा कारभार आहे. राज्याचे गृहमंत्री या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपद महिला व बालविकासमंत्र्यांकडे असते. मात्र या नेत्यांना बालसुधारगृहांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नसल्याने या सुधारगृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुंबईतील या आठ बालसुधारगृहांपैकी मानखुर्दमधील बालसुधारगृहात सामान्य मुलांसोबत गतिमंद व विविध आजारांनी ग्रासलेल्या मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या उपचारासाठीची सामग्री, औषधांसाठी पैसाही तिजोरीत नसल्याने येथे ही मुले तडफडत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुलांना राहण्यासाठी योग्य जागा नाही, पौष्टिक अन्न नाही, कपडे नाहीत, पिण्यासाठी योग्य पाणी नाही अशा अनेक समस्या येथे मुलांना भेडसावत आहेत. शासनाकडून एका मुलामागे केवळ ६३५ रुपये निधी दिला जातो. यामध्ये मुलांचा खर्च भागवणे अत्यंत कठीण जात असल्याने देणगीदार शोधण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.योग्य उपचारांअभावी मुलांचा मृत्यू ओढवत आहे. गेल्या दीड महिन्यात ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले अल्पवयीन असून यात एका मुलीचाही समावेश आहे.