शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जि.प., पं.स.साठी ५५७ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 03:47 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना

आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्यासह अन्य पक्षातील ५५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण सभा, रॅली, आरोप- प्रत्यारोपांनी चांगलेच तापणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बहुतांश राजकीय पक्षातील बंडोबांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे राहिले होेते. बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी राजकीय डावपेच आखत त्यांना थंड करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १३५ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर ११८ पंचायत समितीच्या जागांसाठी २३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणामध्ये आता ३७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.