शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

55 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचा आज शुभारंभ

By admin | Updated: December 24, 2016 05:09 IST

मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास येत्या पाच ते सहा वर्षानंतर अधिक सुकर व वेगवान होण्याची आशा आहे. एमआरव्हीसीतर्फे

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास येत्या पाच ते सहा वर्षानंतर अधिक सुकर व वेगवान होण्याची आशा आहे. एमआरव्हीसीतर्फे तब्बल ५५ हजार कोटी रुपये किंमतीचे विविध रेल्वे प्रकल्प राबविले जाणार आहेत. या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत शनिवारी केला जाईल. यामध्ये एमयुटीपी- ३, वांद्रे ते विरार एलिव्हेटे,सीएसटी ते विरार एलिव्हेटेड आणि पनवेल-वसई-विरार कॉरीडोर यांचा समावेश असल्याची माहिती एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन), मध्य व पश्चिम रेल्वेकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे एमयुटीपी-३ अंतर्गत ४७ नव्या स्वयंचलित दरवाजाच्या लोकलही दाखल होतील. या लोकल संपूर्ण एसी असाव्यात कि त्याचे काही डबे एसी असावेत यावर विचारविनिमय सुरु असल्याचे एमआरव्हीसीकडून स्पष्ट करण्यात आले. एमआरव्हीसीच्या एमयुटीपी-३ मधील ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. यामध्ये विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ नव्या लोकल, रेल्वे रुळ ओलांडणे याचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष प्रभात सहाय यांनी दिली. त्याव्यतिरिक्त वांद्रे ते विरार, सीएसटी ते पनवेल आणि विरार-वसई-पनवेल या तीनही प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. यातील विरार-पनवेल प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळणे बाकी असल्याचे सांगितले. त्याला अंतिम मंजुरी मिळताच प्रथम याच प्रकल्पाच्या कामाला त्वरीत सुरुवात केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लागताच मुंबई उपनगरीय लोकलची प्रवासी क्षमता आणखी २0 लाखांनी वाढणार आहे. प्रथम एक लोकल मुंबईत दाखल होताच त्याची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर ऊर्वरीत लोकलमध्ये काही बदल करायचे कि नाही त्याचा निर्णय घेतला जाईल. या लोकल चेन्नईतील रेल्वेच्या फॅक्टरीत बनवण्याचा विचार आहे. दाखल होणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांसाठी सोयिसुविधाही दिल्या जातील,अशी माहिती सहाय यांनी दिली.एसी लोकलचा प्रवास अधांतरीच-सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल अजूनही सेवेत दाखल झालेली नाही. याबाबत उपस्थित पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांना विचारले असता, त्यांनी एसी लोकल धावणार मात्र ती कुठे याबाबत त्यांनी स्पष्ट केले नाही. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या आहे. त्यामुळे त्यातून काही मार्ग निघतो का ते तपासून पाहात असल्याचे सांगितले.