शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी

By admin | Updated: August 27, 2014 00:58 IST

शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत.

अनेकांना कायमचे अपंगत्व : अघोरी प्रथेपुढे प्रशासन हतबलसंजय खासबागे - वरुडशेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे. प्रेमकथेच्या आख्यायिकेवरुन अनेक वर्षांपासून सावरगाव आणि पांढुर्णा या नदीकिनारी असलेल्या दोन्ही गावांत पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरते. प्रेमवीरांची ही कहाणी जपणाऱ्या दोन्ही गावातील नागरिक एकमेकांवर दगडफेक करतात. येथील गोटमार यात्रेत येणारा प्रत्येक माणूस एक दगड मारल्यानंतरच चंडी मातेचे दर्शन घेतो. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष उभारून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजाअर्चा झाली की, गोटमार यात्रेला सुरुवात होते. माध्यान्नानंतर या यात्रेला रंगत चढते. विदर्भासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून ही गोटामर यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. सावरगांव आणि पांढुर्ण्यांच्या भोळ्याभाबड्या नागरिकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरु असताना गंभीर आणि किरकोळ दुखापती होणाऱ्यांकरिता मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येते. यावेळीही ते होते. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा दरवर्षी येथे भरते. सावरगाव आणि पांढुर्ण्यातील नागरिक तुफान दगडफेक करुन झेंडा आणण्याचा प्रयत्न करतात. अखेर दोन्ही गावांतील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडी देवीच्या मंदिरात आणून विधिवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. यंदा या गोटमार यात्रेत ५०५ जण जखमी झाले आहेत. गोटमारीसाठी दगडाचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसात तणाव झाला होता. श्रध्देतून निर्माण झालेल्या अंध्दश्रध्देमुळे अनेक महिला विधवा झाल्या. कुणी अंध, अपंग झाले. केवळ चंडी मातेच्या अंगाऱ्याने दुखापत बरी होते यावर येथील नागरिकांचा विश्वास आहे. गोटामार यात्रेत गोटमारीत ६० वर्षात १२ लोकांचे बळी गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये महोदव सांबारे, १९७८ मध्ये देवराव सकर्डे, १९७९ मध्ये लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये विठ्ठल तायवाडे, योगिराज चवरे, गोपाल चन्ने, सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.