शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी

By admin | Updated: August 27, 2014 00:58 IST

शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत.

अनेकांना कायमचे अपंगत्व : अघोरी प्रथेपुढे प्रशासन हतबलसंजय खासबागे - वरुडशेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे. प्रेमकथेच्या आख्यायिकेवरुन अनेक वर्षांपासून सावरगाव आणि पांढुर्णा या नदीकिनारी असलेल्या दोन्ही गावांत पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरते. प्रेमवीरांची ही कहाणी जपणाऱ्या दोन्ही गावातील नागरिक एकमेकांवर दगडफेक करतात. येथील गोटमार यात्रेत येणारा प्रत्येक माणूस एक दगड मारल्यानंतरच चंडी मातेचे दर्शन घेतो. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष उभारून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजाअर्चा झाली की, गोटमार यात्रेला सुरुवात होते. माध्यान्नानंतर या यात्रेला रंगत चढते. विदर्भासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून ही गोटामर यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. सावरगांव आणि पांढुर्ण्यांच्या भोळ्याभाबड्या नागरिकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरु असताना गंभीर आणि किरकोळ दुखापती होणाऱ्यांकरिता मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येते. यावेळीही ते होते. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा दरवर्षी येथे भरते. सावरगाव आणि पांढुर्ण्यातील नागरिक तुफान दगडफेक करुन झेंडा आणण्याचा प्रयत्न करतात. अखेर दोन्ही गावांतील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडी देवीच्या मंदिरात आणून विधिवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. यंदा या गोटमार यात्रेत ५०५ जण जखमी झाले आहेत. गोटमारीसाठी दगडाचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसात तणाव झाला होता. श्रध्देतून निर्माण झालेल्या अंध्दश्रध्देमुळे अनेक महिला विधवा झाल्या. कुणी अंध, अपंग झाले. केवळ चंडी मातेच्या अंगाऱ्याने दुखापत बरी होते यावर येथील नागरिकांचा विश्वास आहे. गोटामार यात्रेत गोटमारीत ६० वर्षात १२ लोकांचे बळी गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये महोदव सांबारे, १९७८ मध्ये देवराव सकर्डे, १९७९ मध्ये लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये विठ्ठल तायवाडे, योगिराज चवरे, गोपाल चन्ने, सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.