शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पाच हजार चौ.मी. बांधकामांनाही पर्यावरण एनओसीचे बंधन!

By admin | Updated: July 13, 2017 05:37 IST

पाच हजार चौरस मीटर वा त्यापेक्षा जास्त जमिनीवरील निवासी बांधकामांसाठी पर्यावरणविषयक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक करण्यात आले

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात यापुढे पाच हजार चौरस मीटर वा त्यापेक्षा जास्त जमिनीवरील निवासी बांधकामांसाठी पर्यावरणविषयक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, ही एनओसी देण्याचे राज्य पर्यावरण मंजुरी समितीचे अधिकार काढून घेण्यात आले असून आता प्रत्येक महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात अशी एनओसी देण्यासाठी सेल स्थापन करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या संदर्भात अधिसूचना काढली आहे. यापूर्वी २० हजार चौरस मीटर वा त्यापेक्षा जास्त बांधकामासाठी ही एनओसी लागत असे. आता ही मर्यादा पाच हजार चौरस मीटरवर आणण्यात आली आहे. राज्य समितीचे अधिकार काढून घेण्यात आल्याने राज्यातील विकसक, आर्किटेक्टना मुंबईच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून ते स्थानिक सेलला देण्याच्या निर्णयामुळे त्यांचे हेलपाटे वाचणार आहेत. तसेच, एनओसी मिळण्याच्या कामात गतिमानता येण्यास मदत होणार आहे. तथापि, गावोगावी स्थापन झालेल्या अशा सेलमुळे ‘खाबुगिरी’ला उत्तेजन मिळेल तसेच एनओसीसाठी राजकीय आणि इतर प्रकारचा हस्तक्षेप वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. प्रत्येक ठिकाणच्या सेलमध्ये घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारण आणि व्यवस्थापन, बिल्डिंग मटेरियल, ऊर्जा आणि नवीनीकरण ऊर्जा, पर्यावरण नियोजन (वायू गुणवत्ता व्यवस्थापनासह), वाहतूक नियोजन आणि व्यवस्थापन या प्रत्येक क्षेत्रातील तीन-तीन तज्ज्ञांचा सदर सेलमध्ये समावेश असेल. मल:निस्सारण, वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा वापराची पद्धत, वायूप्रदूषण व्यवस्थापन, हिरवाई, वाहतूक नियोजन, आदी बाबींची पूर्तता बांधकामात करण्यात आलेली आहे की नाही याची तपासणी करून हा सेल एनओसी देईल आणि त्यानंतर सदर इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळू शकेल. पाच हजार ते २० हजार चौरस मीटरपर्यंतचे बांधकाम, २० हजार चौरस मीटर ते ५० हजार चौरस मीटरपर्यंतचे बांधकाम आणि ५० हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बांधकामांसाठी वेगवेगळ्या पर्यावरणविषयक अटी व शर्ती असतील. प्रत्येक टप्प्यात दर ८० चौरस मीटरमागे एक झाड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, कापण्यात आलेल्या एका झाडाच्या मोबदल्यात तीन झाडे लावावीच लागतील. सर्व प्रकारच्या अटी बघता त्यांची पूर्तता करताना विकसकांची दमछाक होणार आहे. तसेच, त्यानंतर हाऊसिंग सोसायटीसमोर या अटींच्या पूर्ततेचे आव्हान असेल. >एनओसी शुल्क आकारणीपर्यावरणविषयक एनओसी देण्यासाठी शुल्क आकारणीचे अधिकार सेललाच असतील. हे शुल्क वेळोवेळी वाढविण्याचे अधिकारदेखील त्यांनाच असतील. पर्यावरणविषयक अटींची पूर्तता न करणाऱ्या इमारतीवर दंड आकारण्याची शिफारस महापालिका/ नगरपालिकेस करण्याचा अधिकार या सेलला असेल. या सेलवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय नियंत्रण असेल.