शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
3
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
4
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
5
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
6
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
7
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
8
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
9
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
10
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
11
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
12
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
13
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
14
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
15
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
16
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
17
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
18
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
19
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय

५0 वर्षात वाशिम जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा ‘वारू’ बेफामपणे उधळला

By admin | Updated: July 11, 2014 00:05 IST

गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही.

वाशिम: गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही. तब्बल चौपट वाढलेल्या लोकसंख्येने ही बाब अधोरेखित केली आहे. १९५१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३,१३,८८८ होती. तथापि, २0११ मध्ये मात्र यात चौपट वाढ होऊन ती तब्बल ११,९७,५00च्या घरात जाऊन पोहोचली आहे. गत काही वर्षांपासून शासनाने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केलेले प्रयत्न जिल्हावासीयांच्या फारसे पचनी पडले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीची सरासरी राज्याच्या तुलनेत १.२४ टक्यांनी वाढलेलीच आहे. सन २0११ च्या जनगणनेत राज्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १५.९९ आहे. तर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १७.२३ टक्के आहे. वाढलेल्या लोकसंख्येने समस्या निर्माण केल्या आहेत.** जिल्ह्याच्या शहरीकरणात झाली झपाट्याने वाढसन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत शहरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. २00१ मध्ये जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोड अशा चार शहरातील लोकसंख्या १७८४४५ एवढी होती. सन २0११ मध्ये२११७0२ एवढी झाली आहे. त्या तुलनेत ग्रामिण भागाची लोकसंख्या मात्र कमी होत गेल ी असल्याचे दिसून येत आहे. साक्षरतेच्या प्रमाणात देखील शहरीभाग समोर निघुन गेला आहे.** जिल्ह्याच्या साक्षरतेमध्येसुद्धा झाली वाढसन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण ८.३४ टक्यांनी वाढले आहे. २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७३.३६ टक्के होते.तर २0११ मध्ये सदर प्रमाण ८१.७0 टक्यावर पोहोचले आहे. यामध्ये पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ९0.५४ तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ७२.२६ टक्के आहे. या दहा वर्षाच्या कालखंडात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे.