शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

By admin | Updated: March 20, 2017 21:36 IST

जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़

२१९ प्रकल्प : पाण्याचा जपून वापर करण्याची गरजउस्मानाबाद : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने मागील चार वर्षाचा दुष्काळ धुवून काढला़ जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ मात्र, मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे़अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मागील चार वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना केला़ दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता़ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले होते़ पाण्याअभावी खरिपासह रबी हंगामातील पिकेही हातची गेल्याने आणि वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते़ अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले़ १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव, माकणी येथील निम्न तेरणा, कळंब नजीकचा मांजरा प्रकल्पासह शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे मध्यम, लघू प्रकल्प भरले होते़सलग चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता़ असे असले तरी मागील पाच महिन्याच्या काळात या प्रकल्पातून तब्बल ५० टक्के पाणीउपसा करण्यात आला आहे़ सद्यस्थितीत २१९ पैकी एक प्रकल्प कोरडा पडला असून, २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ ७० प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ८६ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा आहे़ वाढते उन आणि होणारा पाणीउपसा यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे़ ही बाब पाहता प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर होण्याची गरज आहे़ पाणी वापराचे नियोजन न झाल्यास जिल्हावासियांना भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (चौकट)प्रकल्पांची परिस्थितीउस्मानाबाद तालुक्यातील रूईभर प्रकल्पात ६८़२६ टक्के, तेरणा ६३़१५ टक्के, वाघोली प्रकल्पात ५१़ ३५ टक्के, कळंबमधील रायगव्हाणमध्ये ६६़७० टक्के, भूममधील बाणगंगा प्रकल्पात ३६़४०टक्के, संगमेश्वर प्रकल्पात ५०़३७ टक्के, परंडा तालुक्यातील खासापूर प्रकल्पात ४१़२३ टक्के, चांदणी प्रकल्पात ३३ टक्के, खंडेश्वर प्रकल्पात ५२़२ टक्के, साकत प्रकल्पात ७३़८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़सिना-कोळेगाव मध्ये ४४ टक्के उपयुक्त पाणीजिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात ४४़२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या प्रकल्पात प्रत्यक्षात १०७़८४० दलघमी पाणीसाठा असून, यातील ३३़५४० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ उपयुक्त पाण्याची टक्केवारी ४४़२२ टक्के आहे़ तर माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात प्रत्यक्षात ६०३़८०० दलघमी पाणी असून, यातील ७४़८५९ दलघमी उपयुक्त पाणी आहे़ हा उपयुक्त पाणीसाठा ८२़६३ टक्के इतका आहे़ मागील वर्षी होते केवळ ०़७४ टक्के पाणीमागील वर्षी सन २०१६ मध्ये मार्च महिन्याच्या मध्यावधीच्या कालावधीत जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांमध्ये केवळ ०़७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला़ चालू महिन्यात सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये ३८़७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़