शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

उद्योजक दाम्पत्यास ५० हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 02:45 IST

शिवाजी नगर, नागपूर यथील हेमंत सदाशिव व रश्मी हेमंत भावे या दाम्पत्यास अप्रामाणिकपणा केल्याबद्दल

मुंबई : शिवाजी नगर, नागपूर यथील हेमंत सदाशिव व रश्मी हेमंत भावे या दाम्पत्यास अप्रामाणिकपणा केल्याबद्दल हायकोर्टाने फटकारले असून या दोघांनी मिळून दाव्याच्या खर्चापोटी सरकारला ५० हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला आहे.निकालपत्राच्या सुरुवातीसच या दाम्पत्यास ‘एक हुशार दाम्पत्य’ असे संबोधून न्या. भूषण गवई व न्या. पी.एन. देशपांडे यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली आणि सत्य दडविण्याचा अप्रमाणिकपणा केल्याबद्दल त्यांनी दाव्याच्या खर्चापोटी ५० हजार रुपये नागपूर विधा सेवा उपसमितीकडे सहा आठवड्यांत जमा करावे, असा आदेश दिला. सर्व्हे क्र. १४५/२, पटवारी हलका क्र. ४२, मौझा, खापरी रेल्वे, ता. नागपूर ग्रामीण येथील भूखंड क्र. ४, ५ व ६ या आपल्या जमिनींचे सरकारने केलेले भूसंपादन केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्यानुसार संपुष्टात आल्याचे जाहीर करावे, यासाठी भावे दाम्पत्याने ही याचिका केली होती. भावे यांचे हे भूखंड औद्योगिक पट्ट्यातील होते. केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्याच्या कलम २४ (२)चा हवाला देत या दाम्पत्याने असा दावा केला होता की, या भूसंपादनाचा निवाडा नवा कायदा लागू होण्याच्या पाच वर्षांहून आधी म्हणजे डिसेंबर २००४ मध्ये झाला होता. शिवाय या जमिनींचा ताबा सरकारने प्रत्यक्षात कधीच घेतलेला नसून त्या आजही आमच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे नव्या कायद्यानुसार या जमिनींचे भूसंपादन संपुष्टात आले आहे. मात्र सरकारी वकील व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरून न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, भावे यांनी सत्य दडवून ठेवले एवढेच नव्हे जुन्या भूसंपादन कायद्यानुसार सर्व लाभ घेतल्यानंतरही नवा कायदा येताच त्याचा फायदा घेण्यासाठी त्यांनी अप्राणिकपणे ही याचिका केली आहे. खरे तर याचिकेतील वादग्रस्त तथ्ये पाहता एरवी आम्ही याचिकाकर्त्यास दिवाणी न्यायालयात जाण्यास सांगितले असते, पण त्यांचे वर्तन पाहून याचिकेचा फैसला आम्हीच करीत आहोत, असे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)