शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकच्या ५० टक्के जागा रिक्त राहणार

By admin | Updated: June 30, 2015 03:10 IST

राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत.

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी तंत्रज्ञान (पॉलिटेक्निक) पदविकेच्या ४९३ संस्थांमधील १ लाख ८० हजार ३५ जागांसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी केवळ ९१ हजार ३६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा एकूण संस्थांमधील सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे.अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविकेच्या आॅनलाइन प्रक्रियेस १६ जूनपासून सुरुवात झाली. शनिवारपर्यंत केवळ ५० हजार प्रवेश अर्ज दाखल झाल्याने संस्थांचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेवटच्या दोन दिवसांत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने किमान ५० टक्के जागा तरी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे सोयीचे ठरणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने संस्थाचालकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बड्या संख्येने संस्था बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण गेल्या वर्षीही ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.प्रवेश अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास २ ते ४ जुलैदरम्यान अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) मार्गदर्शन केले जाईल. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कॅप राउंडनुसार प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १७ जुलैदरम्यान आॅनलाइन प्रवेशासाठी पसंतीक्रम निश्चित करावे लागतील. या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २० जुलैला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तर दुसऱ्या कॅप राउंडप्रमाणे २१ ते २४ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. समुपदेशनाची फेरी १० ते १४ आॅगस्टदरम्यान पार पडेल. त्या माध्यमातून रिक्त झालेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, तर ३ आॅगस्टपासून कॉलेजेसला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)