शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

अपघाती मृत्यूबद्दल ४६ लाखांची भरपाई

By admin | Updated: November 5, 2015 01:00 IST

सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई

मुंबई : सहा वर्षांपूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका विवाहित महिलेच्या पती व दोन मुलांना ४६. ६१ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.सांगली येथील मोटार अपघात भरपाई दावा न्यायाधिकरणाने या अपघातग्रस्त कुटुंबास ४९ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश गेल्या वर्षी मे महिन्यात दिला होता. त्याविरुद्ध न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने केलेले अपील न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने फेटाळले. खंडपीठाने न्यायाधिकरणाच्या निकालात थोडा बदल करून भरपाईची रक्कम ४९ ऐवजी ४६. ६१ लाख रुपये केली. तसेच त्यावर दावा दाखल केल्यापासून म्हणजे २००९ पासून सहाऐवजी सात टक्के दराने व्याज देण्याचा आदेश दिला. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस असलेल्या ४४ वर्षांच्या उज्ज्वला गरुड यांचे ३ जानेवारी २००९ रोजी अपघाती निधन झाले होते. एका बैठकीसाठी मुंबईत आलेल्या उज्ज्वला भाड्याच्या स्कॉर्पिओ गाडीने घरी परत चालल्या होत्या. ती गाडी इस्लामपूर येथील रघुनाथ ज्ञानू खांबे यांच्या मालकीची होती व इम्तियाज लुकमान मणेर ती चालवीत होता. मुंबई-पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने जात असता रावेत फाट्याजवळ इम्तियाजचा गाडीवरीलताबा सुटला व ती पलटी झाली. अपघातात उज्ज्वला यांचे जागीच निधन झाले.या अपघाताबद्दल उज्ज्वलाचे पती सुनील परशुराम गरुड व सुमित (२५) व संकेत (२२) या दोन मुलांनी केलेला दावा मंजूर करून सांगलीच्या न्यायाधिकरणाने ४९ लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्याविरुद्ध अपगातग्रस्त वाहनाचा विमा ज्यांनी उतरविला होता त्या विमा कंपनीने अपील केले होते. आता उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या ४६.६१ लाख रुपये भरपाईवर गरुड कुटुंबास २००९ पासूनचे व्याज मिळेल. ही रक्कम पतीला २० टक्के व दोन्ही मुलांना प्रत्येकी ४० टक्के अशी वाटून दिली जाईल. दोन्ही मुलांना मिळणाऱ्या भरपाईपैकी प्रत्येकी १० लाख रुपये त्यांच्या नावे पाच वर्षांसाठी बँकेत मुदत ठेवीत ठेवले जातील. भरपाई गाडीमालक, चालक व विमा कंपनी यांनी मिळून द्यायची आहे. (विशेष प्रतिनिधी)विमा कंपनीचे मुद्दे फेटाळलेमयत उज्ज्वला यांना ६ व्या वेतन आयोगानुसार भविष्यात किती पगार मिळू शकला असता हे गृहित धरून भरर्पाईचा हिशेब करणे चुकीचे आहे. उज्ज्वला खासगी शिक्षण संस्थेत नोकरला होत्या व त्यांची नोकरीही कायम नव्हती. त्यामुळे ६ व्या वेतन आयोगाचा पगार गृहित धरता येत नाही. शिवाय ही संस्था पुढील इतकी वर्षे सुरु राहिलीच असती याचीही खात्री नाही. परंतु उज्ज्वला यांचा पगार व नोकरीचे स्वरूप याविषयी ठोस पुरावे दिले गेले आहेत. शिवाय खासगी संस्था वेतन आयोगानुसार कधीच पगार देत नाहीत, असे नाही.मोटार बेदरकारपणे सूसाट वेगाने चालविली गेली. त्यामुळे आम्ही जबाबदार नाही. पण यास काही पुरावा नाही. ड्रायव्हरची साक्ष काढणे शक्य होते, पण तसे केले गेले नाही.