शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

नंदुरबारमध्ये ४५ गावे, ९६८ पाडे काळोखात

By admin | Updated: August 31, 2016 05:17 IST

जिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे

मनोज शेलार , नंदुरबारजिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे. अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या या गावांत सरदार सरोवर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे.नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरणासाठी मोठी कसरत होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतु तेही अवघे एक ते दीड वर्षच टिकतात. त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गावे काळोखातच राहतात. जिल्ह्यातील ९३० पैकी ८८५ गावांमध्ये विद्युतीकरण झालेले आहे. २९९१ पैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. मात्र ४५ गावे व ९६८ पाड्यांना विजेची प्रतीक्षा असून विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर त्यापैकी १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे, तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.