शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४४५.२९ हेक्टर वनजमीन देण्यास मान्यता

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने १० वषार्नंतर ४४५.२९ हेक्टर (१११३ एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग

- नारायण जाधव,  ठाणेप्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने १० वषार्नंतर ४४५.२९ हेक्टर (१११३ एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे. यामुळे विक्रमगड तालुक्यातील चार गावे बाधित होणार असून भविष्यात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिघळणार आहे. यात शेवता, जांभे, खुदेड आणि साखरे या गावांचा समावेश आहे. वनजमीन ताब्यात येण्याआधीच या प्रकल्पाच्या १८६ कोटी रुपयांच्या कामास २००६ सालीच मान्यता दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी ५३१.१८६ हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता. शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांची भविष्यात तृष्णा भागवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित लिंक प्रोजेक्टचा देहरजी मध्यम प्रकल्प हा एक भाग आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसाचे वाया जाणारे पाणी वैतरणामार्गे या प्रकल्पात आणण्याचे प्रस्तावित आहे. तो पूर्ण झाल्यास पाणीटंचाईने होरपळणाऱ्या एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांना दिलासा देण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, या प्रकल्पास स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा प्रचंड विरोध आहे. कारण, या धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी न देता ठाणे, मुंबईला देण्याचा राज्य शासनाचा घाट असल्याचा त्यांचा आरोप आहे.विशेष म्हणजे वनजमीन ताब्यात मिळण्याआधीच देहरजीसह विदर्भातील जीगाव प्रकल्पाचे काम मे. पीव्हीआर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांचा खर्च ३८६ कोटी होता. त्यात देहरजीचे काम १०४ कोटींचे होते. मात्र, आता काम लांबल्याने या प्रकल्पांचा खर्च कितीतरी पटीने वाढणार आहे. देहरजीच्या कामात मुख्य धरणासह कॅनाल आणि तत्सम कामांचा समावेश आहे.देहरजी मध्यम प्रकल्प हा केंद्र सरकारचा लिंक प्रोजेक्टमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र, स्थानिकांचे शेतजमिनीसह योग्य मोबदला देऊन पुनर्वसन व्हायला हवे. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे.- माजी आमदार विवेक पंडितदेहरजी धरणाचा १९८५ साली आराखडा बनवला, तेव्हा ते सिंचनासाठीच राहील, असे सांगण्यात आले होते. तसेच आदिवासी उपयोजनेच्या निधीतून ते बांधण्यात येणार आहे. मात्र, नव्या आराखड्यात लिंक प्रोजेक्टच्या नावाखाली त्यातून शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्राला वगळले आहे. आमच्या अनमोल जमिनी काय मुंबई आणि ठाण्याची तहान भागवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या धरणांसाठीच आहेत का. जमीन आमची, आदिवासी उपयोजनेचा निधीही आमचा, पाणी मात्र आदिवासी शेतकऱ्यांना न देता ते मुंबई-ठाण्याला द्यायचे, हा कोणता न्याय आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठीच मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. पावसाळ्यात ३०० एमएमपर्यंत पाऊस होत असतानाही आम्हाला वर्षभर पिके घेता येत नाहीत. मग, आम्ही काय करायचे.- प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष : कुणबीसेना, पालघर जिल्हा