शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

४४५.२९ हेक्टर वनजमीन देण्यास मान्यता

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने १० वषार्नंतर ४४५.२९ हेक्टर (१११३ एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग

- नारायण जाधव,  ठाणेप्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने १० वषार्नंतर ४४५.२९ हेक्टर (१११३ एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे. यामुळे विक्रमगड तालुक्यातील चार गावे बाधित होणार असून भविष्यात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिघळणार आहे. यात शेवता, जांभे, खुदेड आणि साखरे या गावांचा समावेश आहे. वनजमीन ताब्यात येण्याआधीच या प्रकल्पाच्या १८६ कोटी रुपयांच्या कामास २००६ सालीच मान्यता दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी ५३१.१८६ हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता. शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांची भविष्यात तृष्णा भागवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित लिंक प्रोजेक्टचा देहरजी मध्यम प्रकल्प हा एक भाग आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसाचे वाया जाणारे पाणी वैतरणामार्गे या प्रकल्पात आणण्याचे प्रस्तावित आहे. तो पूर्ण झाल्यास पाणीटंचाईने होरपळणाऱ्या एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरांना दिलासा देण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, या प्रकल्पास स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा प्रचंड विरोध आहे. कारण, या धरणाचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी न देता ठाणे, मुंबईला देण्याचा राज्य शासनाचा घाट असल्याचा त्यांचा आरोप आहे.विशेष म्हणजे वनजमीन ताब्यात मिळण्याआधीच देहरजीसह विदर्भातील जीगाव प्रकल्पाचे काम मे. पीव्हीआर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांचा खर्च ३८६ कोटी होता. त्यात देहरजीचे काम १०४ कोटींचे होते. मात्र, आता काम लांबल्याने या प्रकल्पांचा खर्च कितीतरी पटीने वाढणार आहे. देहरजीच्या कामात मुख्य धरणासह कॅनाल आणि तत्सम कामांचा समावेश आहे.देहरजी मध्यम प्रकल्प हा केंद्र सरकारचा लिंक प्रोजेक्टमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यास आमचा विरोध नाही. मात्र, स्थानिकांचे शेतजमिनीसह योग्य मोबदला देऊन पुनर्वसन व्हायला हवे. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावे.- माजी आमदार विवेक पंडितदेहरजी धरणाचा १९८५ साली आराखडा बनवला, तेव्हा ते सिंचनासाठीच राहील, असे सांगण्यात आले होते. तसेच आदिवासी उपयोजनेच्या निधीतून ते बांधण्यात येणार आहे. मात्र, नव्या आराखड्यात लिंक प्रोजेक्टच्या नावाखाली त्यातून शेतकऱ्यांच्या सिंचन क्षेत्राला वगळले आहे. आमच्या अनमोल जमिनी काय मुंबई आणि ठाण्याची तहान भागवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या धरणांसाठीच आहेत का. जमीन आमची, आदिवासी उपयोजनेचा निधीही आमचा, पाणी मात्र आदिवासी शेतकऱ्यांना न देता ते मुंबई-ठाण्याला द्यायचे, हा कोणता न्याय आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठीच मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. पावसाळ्यात ३०० एमएमपर्यंत पाऊस होत असतानाही आम्हाला वर्षभर पिके घेता येत नाहीत. मग, आम्ही काय करायचे.- प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष : कुणबीसेना, पालघर जिल्हा