शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयांत ४३५ कोटी जमा

By admin | Updated: November 13, 2016 03:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० व ५०० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याने, नोटा बदली करण्यासाठी बँकांबरोबरच राज्यातील टपाल कार्यालयांतही नागरिकांची झुंबड उडाली. १० नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील टपाल कार्यालयांत ४३५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पोस्ट मास्तर जनरल यांनी दिली.व्यवहारातून रद्द करण्यात आलेल्या १००० व ५०० नोटा बँकेव्यतिरिक्त टपाल कार्यालयांतूनही बदलून मिळतील, असे मोंदींनी जाहीर केल्यावर, लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकेबरोबरच टपाल कार्यालयांबाहेरही रांगा लावल्या. पुरेसे सुटे पैसे उपलब्ध नसल्याने, पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांतील टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. मात्र, १० नोव्हेंबरपासून टपाल कार्यालयांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली. ‘१० नोव्हेंबरला टपाल कार्यालयांनी जुन्या नोटा बचतखात्यात जमा करून घेतल्या, तसेच टपाल कार्यालयांत खाते नसलेल्यांना नोटा बदलूनही दिल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी एकूण २०५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा राज्यातील टपाल कार्यालयांत जमा झाल्या, तर शुक्रवारी २३० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा टपाल कार्यालयांत जमा करण्यात आल्या,’ असे महाराष्ट्र-गोवा सर्कलचे पीएमजी एच. सी. अग्रवाल यांनी सांगितले. टपाल विभागाने गुंतवणुकीच्या योजना लोकांना समजावून दिल्या, त्यांना लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘आमच्या योजनांमध्ये अनेक लोकांनी रस दाखवला. टपाल कार्यालयांत बचतखाते सुरू करण्यासाठी व अन्य योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेकांनी फॉर्म नेले आहेत,’ असेही अग्रवाल यांनी म्हटले.(प्रतिनिधी)