शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

हज यात्रेसाठी कोकणला मिळणार ४००यात्रेकरूंचा कोटा

By admin | Updated: October 17, 2016 22:26 IST

येत्या हज यात्रेसाठी देशाला २ लाख हज यात्रेकरूंचा कोटा मिळणार आहे. त्यामुळे या यात्रेसाठी कोकणच्या कोट्यातही वाढ होईल. ४०० यात्रेकरूंचा कोटा कोकणला मिळेल.

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 17 -  येत्या हज यात्रेसाठी देशाला २ लाख हज यात्रेकरूंचा कोटा मिळणार आहे. त्यामुळे या यात्रेसाठी कोकणच्या कोट्यातही वाढ होईल. ४०० यात्रेकरूंचा कोटा कोकणला मिळेल. त्यामुळे अनेकांचे या यात्रेला जाण्याचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय हज कमिटीचे उपाध्यक्ष शेख जीना यांनी रत्नागिरी येथे सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
भाजपच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयात जीना यांनी आज येथील मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाºयांची संख्या मोठी आहे. याआधी कोकणातून केवळ ६० ते ७० मुस्लिम बांधवांनाच हज यात्रेला जाण्याची संधी मिळत होती. ही संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी सुरू होती. त्याचा विचार करून येत्या यात्रेसाठी कोकणचा कोटा ४००पर्यंत वाढवून मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
कॉँग्रेसने देशात ६० वर्षे राज्य केले. मात्र मुस्लिम समाजाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर गेली अडीच वर्षे केंद्रीय सत्तेत असलेल्या भाजपने मात्र मुस्लिम समाजाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. गोव्यात आघाडी सरकारच्या काळात उर्दु अंजुमन स्कूलना निधी दिला जात नव्हता. भाजप सरकारने या शाळांंना आता निधीची उपलब्धता करून दिली आहे. मुस्लिम समाज भाजपबरोबर राहिल्यास समाजाचे भवितव्य उज्वल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले निर्णय घेत आहे, असे जीना म्हणाले. 
नगर परिषदांच्या निवडणुका जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर २०१६ रोजी होत आहेत. रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण नगरपरिषद व दापोली नगर पंचायत येथे या निवडणुका होत असून, या सर्व ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांबरोबर आपण बैठका घेणे सुरू केले आहे. राजापूर येथे दोन ठिकाणी, तर रत्नागिरीत एका ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या बैठका सोमवारी घेण्यात आल्या. त्यांच्या भावना, त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यावेळीही मुस्लिम समाजाने या निवडणुकांमध्ये भाजपाबरोबर राहणार असल्याचे मत व्यक्त केले, असा दावा जीना यांनी केला. 
भाजपबाबत जोरदार समर्थन करताना शेख जीना म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आल्यानंतर विकासाबाबत नवे पर्व सुरू झाले आहे. सर्व देशांचा दौरा करणारे मोदी यांना त्या देशांनीही एक यशस्वी पंतप्रधान म्हणून मान्यता दिली आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार यशस्वी होत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजानेही भाजपबरोबर राहावे. त्यामुळे सर्व स्तरावर मुस्लिम समाजाचा सर्वांगिण विकास होईल, असा विश्वास जीना यांनी व्यक्त केला.