शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू किनारपट्टीतील ४० गावे २ दिवस अंधारात

By admin | Updated: September 18, 2016 02:02 IST

अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती सक्तीने वसूल करणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे डहाणूच्या किनारपट्टीतील भागांतील चाळीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात खितपत पडली

डहाणू : विजेची अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती सक्तीने वसूल करणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे डहाणूच्या किनारपट्टीतील भागांतील चाळीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात खितपत पडली असून येथील ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या वीज महावितरणच्या कारभाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.या भागात गेल्या शुक्रवारपासून धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे येथील लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झालेले असतानाच त्यात भर म्हणून गेल्या दोन दिवसांपासून येथील वीज बेपत्ता आहे. बहाड, बाबला तलाव तसेच बोईसर येथील ३३ के.व्ही. केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने आज शनिवारी पहाटे चार वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र १५ तासानंतर वरोर, वानगांव, फीडर सुरू झाले. परंतु रात्री आठ वाजले तरी चिंचणी फीडर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिड निर्माण होऊन सर्वत्र महावितरणच्या विरोधात आंदोलन उभारण्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो.दरम्यान वीज नसल्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. (वार्ताहर)