शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट कर्मचाऱ्यांना हवी ४० टक्के पगारवाढ

By admin | Updated: May 17, 2016 05:34 IST

बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना ४० टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बेस्ट वर्कर्स युनियनने बेस्टचे महाव्यवस्थापकांना दिला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. त्यामुळे नव्या वेतन करारात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.याआधी २००६ ते २०११ आणि सन २०११ ते २०१६ या कालावधीसाठीचा वेतन करार २८ एप्रिल २०१२ रोजी झाला होता. त्यामुळे यंदाचा वेतनकरार वेळेत करण्याची मागणी युनियनने केली आहे. राव म्हणाले की, बेस्ट उपक्रमाने २००७ सालापासून यापूर्वीचा करार होईपर्यंत रोजंदारी पद्धतीने व कनिष्ठ श्रेणी निर्माण करून समारे ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करताना त्यांची मातृश्रेणी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ हजार ९३० करता आली नाही. नव्या कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना केवळ ५ हजार ४३० मातृश्रेणी ठरवण्यात आली. परिणामी, या कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. त्यामुळे नव्या वेतन करारात या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी राव यांनी प्रशासनाकडे केली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे युनियनने उपक्रमातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १५ हजार ३०० करण्याची मागणी केली आहे. शिवाय बसवाहक व बासचालकांचे किमान मूळ वेतन अनुक्रमे १६ हजार ६०० व १७ हजार २०० रुपये करण्याची मागणी युनियनने प्रस्तावात केली आहे.प्रस्तावातील अन्य महत्त्वाच्या मागण्याबेस्ट उपक्रमातील महिला कर्मचाऱ्यांना केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बाल संगोपन रजा मिळावी.३ लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावरील व्याजापोटी भरावयाच्या रकमेसाठी अनुदान देण्यात यावे.बेस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ६ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करावी.पालिकेने निधी द्यावाजूनच्या शेवटच्या आठवड्यात महाव्यवस्थापकांकडून यासंदर्भात चर्चेसाठी बैठक होण्याची शक्यता राव यांनी व्यक्त केली. बेस्ट तोट्यात असल्याचे कारण पुढे करत जर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार असेल, तर मुंबई महानगरपालिकेने पालक म्हणून बेस्टला निधी देण्याची मागणी राव यांनी केली आहे.