शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राज्यातील ३९ शेतकरी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यावर!

By admin | Updated: September 3, 2014 01:32 IST

विदर्भातील केवळ तीन शेतकर्‍यांना संधी

अकोला : जागतिक कृषी क्षेत्रातील उपलब्धी व त्याचा भारतीय शेतीत वापर करता यावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांचे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे काढण्यात येत असून, यावर्षी राज्यातील ३९ शेतकरी या अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. पश्‍चिम विदर्भातील जवळपास ३0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी यावर्षीच्या दौर्‍यासाठी अर्ज केले होते; परंतु नेहमीप्रमाणे या दौर्‍यात विदर्भातील के वळ तीनच शेतकर्‍यांना संधी देण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.जगातील प्रगत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करू न त्या पद्धतीची आधुनिक शेती येथील शेतकर्‍यांना करता यावी, हा या शेतकरी आंतरराष्ट्रीय दौर्‍यामागील उद्देश आहे. त्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यातील प्रगतिशील शेतकर्‍यांचा आंतराष्ट्रीय अभ्यास दौरा काढण्यात येत असतो. या शेतकर्‍यांचा प्रवासाचा ५0 टक्के खर्च कृषी विभागामार्फत केला जातो. यावर्षी या दौर्‍यासाठी राज्यातील ३९ शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. हे ३९ शेतकरी र्जमनी, स्वित्झरलँड, नेदरलँड यासारख्या कृषी क्षेत्रात अतिशय प्रगत असलेल्या राष्ट्रांना भेटी देऊन, तेथील तंत्रज्ञान अवगत करणार आहेत.दरम्यान, अलिकडच्या काळात विदर्भातील शेकडो शेतकरी शेतात वेगवेळे प्रयोग करीत असून, आधुनिक शेतीकडे त्यांचा कल वाढला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेती कंपन्या स्थापन करू न, व्यावसायिक शेतीलाही सुरुवात केली आहे. आता तर हरितगृह, पॉलिहाऊससारख्या आधुनिक शेतीची कास येथील शेतकर्‍यांनी धरली असून, फलोत्पादनातही आघाडी घेतली आहे; परंतु विदर्भातील अकरा जिल्हय़ातून केवळ अमरावती, बुलडाणा व नागपूर या तीन जिल्हय़ातील प्रत्येकी एका शेतकर्‍याचीच निवड करण्यात आल्याने, इतर इच्छुक शेतकर्‍यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. *शेतकर्‍यांसोबत शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रातील प्रगत राष्ट्रांना भेटी देण्यासाठी विदर्भातील जे तीन शेतकरी आंतरराष्ट्रीय दौर्‍यावर गेले आहेत, त्यांच्यासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रदीप इंगोले आहेत. या शेतकर्‍यांना त्या प्रगत राष्ट्रातील शेतीसंदर्भातील माहिती ते समजावून सांगणार आहेत.*या अभ्यास दौर्‍यासाठी पश्‍चिम विदर्भातून जवळपास ३0 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. हे सर्व अर्ज आम्ही पुणे येथील संचालनालय विस्तार कार्यालयाकडे पाठविले होते. जे शेतकरी निकषात बसले, त्यांची नावे या दौर्‍यासाठी निश्‍चित करण्यात आली .- एस.आर. सरदार सहसंचालक,कृषी विभाग, अमरावती.