शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

राज्यात डेंग्यूसाठी ३७ सेंटिनल सेंटर्स

By admin | Updated: October 16, 2016 02:35 IST

जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या

मुंबई : जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळून गुंतागुंत कमी व्हावी यासाठी राज्यभरात ३७ सेंटिनल सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांना डेंग्यू रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात आॅक्टोबर महिन्यापर्यंत स्थिरावलेल्या पावसामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) एकूण ४ हजार ८२० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर २५५, नाशिकमध्ये २२२ आणि पुण्यात १६६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिका क्षेत्रात मुंबईत ७८३, नाशिकमध्ये ६४० आणि ठाण्यात ४४३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. २६ महापालिका क्षेत्रात ३ हजार २६० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात पसरलेली चिकनगुनियाची साथ अजूनही आटोक्यात आली नाही. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) पुणे महापालिका क्षेत्र, पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद येथे ८७७ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण परिसरात २६६ रुग्ण आढळले आहेत. आॅक्टोबर महिन्यात मुंबईत चिकनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत, तर चिकनगुनियाचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)डेंग्यूचे ४०७ रुग्ण राज्यात आॅक्टोबर महिन्यात (१ ते ७ आॅक्टोबर) डेंग्यूचे ४०७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात असलेला चिकनगुनिया आता मुंबईतही आला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन साथरोग नियंत्रण कक्षाने केले आहे.