शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ठाण्यातील ३६ तलाव कात टाकणार

By admin | Updated: April 4, 2017 04:12 IST

महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली

ठाणे : लोकमतने काहीतरी कर ठाणेकर, या चळवळीअंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेऊन महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली आहे. यानुसार, शहरातील ३६ तलावांचा एकात्मिक सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास राज्य शासनानेदेखील मंजुरी दिली आहे. यामुळेच तलाव पुनरुज्जीवन व शुद्धीकरण या लेखाशीर्षांतर्गत ३० कोटी आणि तलाव सुशोभीकरणांतर्गत ९.५० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे ठाण्यातील तलाव लवकरच कात टाकणार आहेत.ठाण्यातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’ने ‘काहीतरी कर ठाणेकर’, या चळवळीअंतर्गत याला वाचा फोडली होती. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तलवांचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने त्यानुसार पावले उचलली आहेत. महापालिका हद्दीत ३६ तलाव असून त्यांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यासाठी सर्व तलाव व तलाव परिसर प्रदूषणमुक्त व नागरी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी पालिकेने ही योजना आखली आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तलावातील गाळ काढणे, भिंत उभारणे, जॉगिंग ट्रॅक, एलईडी दिवे, गार्डन, खेळणी, शौचालय, फाउंटन, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, निर्माल्यकलश, गेट उभारण्याच्या कामांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वास्तुविशारद महाविद्यालयास सल्लागार म्हणून नेमण्याची योजना आखली आहे. त्यातून हे तलाव कात टाकतील. (प्रतिनिधी)