अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जुलै व आॅगस्टमध्ये झालेला मुसळधार पाऊस, पूर व वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये ३६ व्यक्तींचा मृत्यू झाला. लहान-मोठी १९३ जनावरे मृत झालीत. तसेच ५ हजार ३५७ घरांची पडझड झाली आहे.यंदाच्या पावसाळ्यात १८ ते २३ जुलै व ४ ते १२ आॅगस्टदरम्यान मुसळधार पाऊस पडला. यामध्ये १८ व्यक्ती पुरात वाहून गेल्यात. यात अमरावती जिल्ह्णात ६, अकोला २, यवतमाळ ७, बुलडाणा जिल्ह्णातील ३ व्यक्तींचा समावेश आहे. दरड कोसळून वाशीम जिल्ह्णात एकाचा मृत्यू झाला. वीज पडून एकूण १६ जण ठार झालेत. यामध्ये अमरावती जिल्ह्णात ४, अकोला २, यवतमाळ ४, बुलडाणा ४ व वाशीम जिल्ह्णातील दोघांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)