शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

खासगी बाजारात ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी!

By admin | Updated: November 14, 2015 02:11 IST

सलग पाच दिवस शासकीय सुटी पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.

अकोला: राज्यात खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक सुरू झाली; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. सलग पाच दिवस शासकीय सुटी असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्याकडील कापूस खासगी बाजारात कमी अधिक दरात विकावा लागत आहे. खासगी बाजारात राज्यात आजमितीस ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस नगदी पीक असून, कापसाचा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. ऐन दसरा-दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच हा कापूस हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्‍यांची हाती कापूस विक्रीचा पैसा येतो, त्यामुळे या सणाचा आनंद व्दिगुणित होतो. यावर्षी पणन महासंघाने दिवाळीपूर्वी २0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत, असे असली तरी ही केंद्र मोजक्याच काही जिल्हय़ांच्या ठिकाणी असल्याने यावर्षी शेतकर्‍यांना कापूस विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खेडा खरेदीदार व खासगी बाजारात कमी अधिक दरात कापूस विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. भारतीय कापूस महामंडळानेदेखील यावर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. दरम्यान, मागील वर्षी ४0५0 रुपये हमीदर होते. तथापि, या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात कापसाची प्रत बघून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाच्या हवी तेवढी वृद्धी नाही तथापि शेतकर्‍यांना सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. केंद्र सुरू केले तेव्हापासून १0 नोव्हेंबरपर्यंत पणन महासंघाने वाशिम जिल्हय़ातील कारंजा खरेदी केंद्रावर ५00 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ एन पी हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पणन महासंघाने सुरुवातीला कापूस क्षेत्र असलेल्या जिल्हय़ात जिल्हानिहाय २0 खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. दिवाळीनंतर तालुकानिहाय कापूस खरेदी केली जाईल. सीसीआयदेखील दिवाळीनंतर कापूूस खरेदी करणार असल्याचे सांगीतले. तर कापूस उद्योजक बंसत बाछुका यांनी खासगी बाजारात राज्यात जवळपास ३२.५0 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल खासगी बाजाराकडे असल्याचे सांगीतले.