शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

खासगी बाजारात ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी!

By admin | Updated: November 14, 2015 02:11 IST

सलग पाच दिवस शासकीय सुटी पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.

अकोला: राज्यात खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक सुरू झाली; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. सलग पाच दिवस शासकीय सुटी असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्याकडील कापूस खासगी बाजारात कमी अधिक दरात विकावा लागत आहे. खासगी बाजारात राज्यात आजमितीस ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस नगदी पीक असून, कापसाचा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. ऐन दसरा-दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच हा कापूस हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्‍यांची हाती कापूस विक्रीचा पैसा येतो, त्यामुळे या सणाचा आनंद व्दिगुणित होतो. यावर्षी पणन महासंघाने दिवाळीपूर्वी २0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत, असे असली तरी ही केंद्र मोजक्याच काही जिल्हय़ांच्या ठिकाणी असल्याने यावर्षी शेतकर्‍यांना कापूस विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खेडा खरेदीदार व खासगी बाजारात कमी अधिक दरात कापूस विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. भारतीय कापूस महामंडळानेदेखील यावर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. दरम्यान, मागील वर्षी ४0५0 रुपये हमीदर होते. तथापि, या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात कापसाची प्रत बघून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाच्या हवी तेवढी वृद्धी नाही तथापि शेतकर्‍यांना सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. केंद्र सुरू केले तेव्हापासून १0 नोव्हेंबरपर्यंत पणन महासंघाने वाशिम जिल्हय़ातील कारंजा खरेदी केंद्रावर ५00 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ एन पी हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पणन महासंघाने सुरुवातीला कापूस क्षेत्र असलेल्या जिल्हय़ात जिल्हानिहाय २0 खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. दिवाळीनंतर तालुकानिहाय कापूस खरेदी केली जाईल. सीसीआयदेखील दिवाळीनंतर कापूूस खरेदी करणार असल्याचे सांगीतले. तर कापूस उद्योजक बंसत बाछुका यांनी खासगी बाजारात राज्यात जवळपास ३२.५0 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल खासगी बाजाराकडे असल्याचे सांगीतले.